Wednesday, February 12, 2025
पुस्तकं वाचनालये आणि आपण...
Friday, January 31, 2025
मोटिवेशनल लेखक आणि समग्रतेची वाणवा
शिव खेरा यांची दोन पुस्तकं... पहिलं पुस्तक कदाचित 1998 99 च्या काळामध्ये प्रकाशित झाला असेल 'जीत आपकी', कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात वाचलेली.. यू कॅन विन.. आणि त्यानंतर 25 ते 26 वर्षानंतर दुसरे पुस्तक आले ते म्हणाजे 'लिव्ह व्हाईल यू आर आलाईव्ह' . पहिल्या पुस्तकाची भाषा बघा त्याद्वारे दिल्या जाणारा संदेश बघा आणि दुसऱ्या पुस्तकाची भाषा आणि त्या दिल्या जाणारा संदेश दोन्हीही एकमेकांपासून अगदी भिन्न.. पहिल्या पुस्तकांमध्ये तुम्ही जिंकू शकता तुम्ही जिंकायलाच हवं आणि त्यासाठी तुम्ही काय काय केले पाहिजे याबद्दल जोर देऊन केलेली सगळी मांडणी. यश मिळवण्यासाठी एकच नाही तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या पाहिजेत आणि म्हणून जो जिंकतो तोच लीडर असतो हे सांगणार पहिले पुस्तक.
आणि; जर, योग्य वेळी थांबला नाहीत तर तुमचा अंत निश्चित आहे अशी आशयाची मांडणी करणारे दुसरे पुस्तक. टेक ब्रेक बिफोर यू ब्रेकडाऊन असे ठळकपणे सांगते. रिलॅक्स रहा. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या, फक्त यशापाठीमागे न धावता कामाशी स्वतःलां बॅलन्स करा, अशीच एकंदरीत मांडणी. म्हणजे पळू नका, ब्रेक घ्या, ब्रेक डाऊनची भीती आणी त्याला अधोरेखित करणारे लिखाण.
आयुष्यात यश मिळवतांनी येणाऱ्या स्ट्रेसला बॅलन्स करताना त्याकडे लक्ष द्यावे असे सांगताना नुसते परफॉर्मन्सच्या मागे धावून जमणार नाही तर वर आयुष्य बॅलेन्स असले पाहिजे यावर यात फोकस केला गेलेला आहे..
लेखकाचा काळ कसा त्याच्यावर, त्याच्या अनुभवावर स्वार असतो तो कितीही तटस्थपणे लिहीत असला तरी त्याचं वय आणि त्याच्या अनुभवाची, जे खूप वैयक्तिक असतं, त्याची भाषा करत असते. आणि हेच त्याने काय लिहावं हे सांगतो. हे शिव खेरांच मानसिक आणि एकंदरीत अनुभवाचे स्थित्यंतर दाखवणार लिखाण अतिशय गमतीशीर आहे. यासोबतच हे बघताना हेही समजून घेण्यासारखे आहे की यश आणि यशाच्या संकल्पनेला सातत्याने, ती तुमच्या बाहेर आहे असे सांगणारे नरेटीव एका विशिष्ट वयानंतर यशाची समज आणि कल्पना ही आतून उदय पावते आणि ती बहिर्गत नाही तर अंतर्गत आहे असे सांगण्याकडे वळते. प्रश्न हा आहे की लेखक स्वतःच संपूर्ण आयुष्याची एकत्रित समज करून घेऊन हे स्थित्यंतर समजून घेऊन, यशाची एकात्मिक जाणीव का करून देत नसतील. किंवा तेवढं थांबून तसा अनुभवून मग लिहिण्यास त्यांच्याकडे वेळ नसावा.
थोड्या फार अनुभव अनुभवानंतर लगेच यश अपयशाच्या व्याख्या म्हणून त्याचे तत्वज्ञान उभा करून मोकळे होऊन जायचं याची एवढी गडबड का ?.
यात विशिष्ट वयाच्या टप्प्यावर जेवढं समजलं तेवढं परसेप्शन घेऊन त्याला यशाच्या व्याख्येत बसून बाजारात आणण्याचे प्रयत्न फक्त फुटकळ संकल्पना मांडण्या पुरतेच राहतात, पुढे चालून त्याचा रेलेवंस संपला की मग यशाची खरी व्याख्या सांगताना पुन्हा दुसरच काहीतरी लिहावं लागतं. अशी वेळ अनेक लेखकांवर आलेली मी पाहिलेली आहे.
एखाद्या लेखकाने मांडलेली एक संकल्पना बदलायला किंवा त्यामध्ये बदल समाविष्ट करायला भविष्यातील विचारवंतांना फार काही करायची गरज पडत नाही, कारण मूळ लेखकच स्वतः वीस पंचवीस वर्षानंतर आपण मांडलेल्या संकल्पनेला पुन्हा बदलून मांडतो.
मुद्दा आहे कुणाचे वाचावे. ज्या लेखकाला आयुष्याकडे समग्र बघण्याची दृष्टी प्राप्त झालेली आहे. आयुष्याच्या विविध अनुभवातून चिंतनातून आणि समग्र जाणीवेतून ज्याचं लिखाण काळाच्या कसोट्यांवर मान्यता पावलं आहे असं लिखाण वाचलं पाहिजे किंवा तस लिहिता यावं अशी अपेक्षा लेखककडून असायला हवी. नाहीतर आयुष्याने पुरवले आणि आयुष्य सुचवू इच्छिणारे हे असले शिफ्ट लेखकालाच बॅलेन्स करता येत नसतील आणि त्याची समग्र व्याख्या करून आपल्या लिखाणाला युनिक आणि समग्रपणे मांडता येत नसेल तर असलं काही लिहून तरुण कर्तुत्ववान आणि जगात सक्षमपणे काहीतरी करू इच्छिणाऱ्या आणि आयुष्याला समग्रपणे पाहू इच्छिणाऱ्या तरुणांचे नुकसान होते. ते तुमचं लिखाण वाचत बसतात आणि जे पटेन्शियली वाचायचं सोडून खूप काहीतरी वाचलं आहे अशा अविर्भावात जगत राहतात. त्यानंतर भविष्यात निर्माण होणाऱ्या कॉन्ट्रोवर्सीजला या लिखाणाचा आणि वाचनाचा काही उपयोग होत नाही मग त्या कॉन्ट्रोवर्सीज सोडवण्यासाठी हेच लेखक पुन्हा काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात.
एकूणच काय तर आपल्या बुद्धीला एकत्वाची समग्रपणाची जाणीव देणारे लिखाण शोधावे आणि तेच वाचावे. असे लिखाण जे कालांतराने आपल्या अनुभवाच्या कसोटीवर खरे उतरत राहील आणि आयुष्यातल्या वेगवेगळ्या आंतरविरोधावर ते एक सम्यक उपाय म्हणून सातत्यपूर्ण मार्गदर्शन करत राहील. असे झाले तर मोजक्या पुस्तकातही आयुष्याला बॅलन्स करण्याचा आणि त्यानुसार सुंदर आयुष्य जगण्याचा समतोल उपाय सापडेल.
सचिन दाभाडे
Friday, July 15, 2022
काही नोंदी..
Friday, December 17, 2021
'भुरा' एक तत्वज्ञान्याची बखर.
Friday, May 7, 2021
बंदी, संधी आणि औद्योगिक क्रांती..!
Monday, April 26, 2021
हट्ट आणि संकल्प
इकोपॉइंट..!
पुस्तकं, हेतू आणि स्मरणशक्ती
Friday, April 9, 2021
उरूस आणि सिनेमा..!
Thursday, October 8, 2020
बॉईलिंग फ्रॉग ते स्वयंनेतृत्व..!
सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com
Wednesday, October 7, 2020
Tuesday, June 16, 2020
"दुसरी स्क्रिप्ट"
अक्षय कुमार सुनील शेट्टी हे माझे लहानपणीचे सगळ्यात आवडते हिरो कारण ते अफलातून फाईट करायचे. ते फाईट करायला लागल्यावर कितीही गुंड आले तरी मला त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कधीच चिंता वाटायची नाही. ते निपटून घेतील असाच फील असायचा त्यांना पडद्यावर पाहतांना. जसा जसा मोठा होत गेलो तसे तसे अक्षय कुमारचे मारधाडीचे चित्रपट तेव्हढेसे अवडेना झाले. त्याच्या पेक्षा अजय देवगणला पाहणं बरं वाटायला लागलं. एक काळ असा आला की त्याचे सिनेमे साधारणतः फ्लॉपच्या कॅटेगिरीत जाणे सुरू झाले होते. मला माहीत होते की हे का होत असेल. त्याला आता सतत फाईट करत पाहणेही प्रेक्षकांना नकोसे झाले असेल. काय वेळ असेल ती जेंव्हा त्याला एक हिरो म्हणून हे अनुभव येत असतील. काही वर्षाने एक मित्रा मला भेटला, तो नुकताच एक सिनेमा पाहून येत होता. मी विचारले काय झाले हसायला. तो हसता हसता म्हणाला, अरे भयंकर भन्नाट सिनेमा पाहून आलोय. माझं प्रश्नचिन्ह तसेच, तो म्हणाला; मी सारख तीन तास पोट धरून हसतोय. एक नवीन सिनेमा आहे "हेरा फेरी" म्हणून, तो बघून येतोय,इतकी तुफान कॉमेडी आहे की बस. मी विचारले कोण आहे हिरो. तो म्हणाला अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी. मला एकदम धक्का बसला..! सुरवातीला विश्वास बसेना अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी, हे कसं शक्य आहे. या दोघांचा आणि कॉमेडीचा काय संबंध. बर केली जरी असेल तरी पोट धरून हसायला लावेल अशी कशी शक्य आहे ?. तो म्हणाला विश्वास नसेल तर आजच बघून घे. अर्थात मी लगेच विश्वास ठेवणार नव्हतोच. 15 दिवस बऱ्याच जणांकडून जेंव्हा हीच प्रतिक्रिया ऐकली तेंव्हा औरंगाबादच्या आंबा अप्सरामध्ये मी शेवटी हेरा फेरी पाहायला गेलोच.
बाहेर आलो तेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक वेगळ्या धाटणीच्या विनोदी सिनेमांचा सुत्रपात करणारा अश्या नव्या प्रकारचा कलाकृतीचा अविभाज्य भाग होऊनच बाहेर आलो. एक भन्नाट कॉमेडी, अफलातून ऍक्टिगं, कुठेही विनोदाचे प्याचप नाही, तर अक्खा सिनेमाचं असा काहीं बांधला होता की विसंगती आणि कॅरेक्टर्सची बेमालूम जुगलबंदी यांनी तुम्ही सतत हसत राहता. जेंव्हा हसत नसला तेंव्हा पुन्हा लगेच हसावे लागणार म्हणून तुमचे तोंड उघडेच राहील अशी संवादाची पेरणी. एकूण काय तर विनोद सिनेमाचा माईल स्टोन.. मैलाचा दगड आणि त्यात आश्चर्य म्हणजे हिरो कोण तर मारधाडीचे माझ्या मनातील आयकॉन अक्षय आणि सुनील. पण आता ते तसे राहिले नव्हते, त्यांना पाहिलं की आता माझ्या मनात हास्याची लकेर उमठायची. वातावरण बदललं होत.
मला लोक ऍक्शन स्टार समजतात म्हणून मी कॉमेडी कारण कसं शक्य आहे असे अक्षय म्हणाला असता तर आता तो आपल्याला पडद्यावर कदाचित दिसला नसता. माझ्या चाहत्यांच्या मनातील माझ्या इमेजला धक्का लागू नये म्हणून तो सतत ऍक्शन मुव्ही करत राहिला असता कदाचित अक्षय काळाच्या गर्तेत केंव्हाच गायब झाला असता. पण त्याने एवढ्या वर्षेपासून निर्माण केलेल्या स्वतःच्या ऍक्शन हिरोच्या प्रतिमेला स्वतःच असा काही सुरुंग लावला की हा ऍक्शन हिरो की कॉमेडी हिरो हा प्रश्नच लोकांना पडू नये. प्रेक्षकांना तो दोन्ही ही रुपात आवडू लागला.
खऱ्या हिरोला माहीत असते, तो एक सामान्य माणूसच आहे. त्याने केलेलं सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण कृतीच त्याला प्रेक्षकांच्या मनाचे सम्राटपद बहाल करीत असते. तो मोठ्या सामर्थ्याने त्या प्रतिमा घडवतोही आणि भविष्याचा अंदाज घेऊन त्या प्रतिमेला स्वतः सुरुंग लावायलाही घाबरत नाही. कारण त्याला एक गोष्ट माहीत असते, हे जर त्याने बनवलय, तर ते मोडून दुसरेही तोच बनवू शकतो. आणि हाच भाव त्याला हिरो बनावत असतो, सुपरहीरो बनवत असतो...!
तुमच्या आयुष्याचा एखादा सिनेमा आपटला की गलितगात्र होण्याची गरज नाही. तुमची हिरो प्रतिमा नष्ट होईल याची भीती पण बाळगण्याचे कारण नाही. दुसरी स्क्रिप्ट लिहायला हातात घ्या.
हो दुसरी स्क्रिप्ट...!
...............
सचिन दाभाडे
Sunday, April 19, 2020
प्राचीन काळात राज्याच्या सैन्यासाठी काम करणाऱ्या लोहाराकडे दोन प्रकारचे साहित्य बनवण्याचे काम असायचे. पाहिले म्हणजे तलवारी आणि भाले बनवणे आणि दुसरे म्हणजे हातकड्या आणि साखळदंड बनवणे. पहिल्या प्रकारचे, म्हणजे तलवारी व भले बनवण्याचे काम, तेंव्हाच जास्त जोरात असायचे जेंव्हा, राज्य हे युध्दाच्या व विस्तारीकरण्याच्या धोरणात असायचे. राज्याच्या विस्तारासाठी होणारे युध्ये ही अश्या हत्यारे निर्मितीसाठी मुख्य प्रेरणा असायची.
आणि हातकड्या व साखळदंड या सारख्या दुसऱ्या प्रकारच्या साहित्य निर्मितीचे काम लोहार तेंव्हाच करायचा जेंव्हा राज्य आपल्या विस्तारीकरणाच्या क्षमतेच्या अत्युच्य टोकावर आहे व राज्याला आता फक्त जे मिळवलं आहे किंवा ताब्यात आहे, ते व्यवस्थित टिकवायचे आहे. अशा अवस्थेत त्यावेळेला शासन करण्यासाठी राज्याला तलवारीची नाही तर हातकड्या आणि साखळदंडाची जास्त गरज भासे. रोमन साम्राज्यातील बऱ्याच घटना उदाहरणादाखल घेता येतील. जेव्हा रोमन साम्राज्य आपल्या यश आणि वाढीच्या सर्वोच्च स्थानावर होते, त्यावेळी लोखंडापासून हत्यारे बनवणाऱ्या कारागिरवर अधिकाऱ्यांची प्रचंड करडी नजर असे आणि त्यांना अतिशय स्पष्टपणे लढण्यासाठी लागणारी हत्यारे बनवायला बंदी होती. कुणीही लोहार आपल्या मनाप्रमाणे तलवारी भाले शासनाच्या अधिकृत मागणीशिवाय बनवू शकत नसे.
लोहाराच्या वर्कशॉपमधील या दोन प्रकारच्या साहित्याच्या उत्पादनावरून त्या त्या साम्राज्याच्या परिस्थितीतीची जाणीव येऊ शकते. पहिल्या प्रकारचे उत्पादन हे हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या गोष्टींना दर्शवतेय, तर दुसऱ्याप्रकारचे उत्पादन हे अडवणूक, दबाव, नियम, बंधन या गोष्टीला दर्शवतेय.
एखाद्या संस्था, समाज किंवा व्यक्तीमध्ये कुठल्या प्रकारच्या प्रेरणा काम करताय. पहिल्या प्रकारच्या की दुसऱ्या प्रकारच्या ?
यापैकी ज्यामध्ये अडवणूक, दबाव, नियम व बंधन या संबंधीच्या भावना वेगाने काम करताय असे आढळले, तर त्या संस्थेचे, समाजाचे किंवा व्यक्तीचे विविध अर्थाने विस्तारण्याचे प्रयोजन संपले आहे असे समजायला काही हरकत नाही. याउलट हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या भावना कुठल्याही संस्थेत, समाजात, किंवा व्यक्तीमध्ये वेगाने काम करताय असे लक्षात आले, तर वाढ होण्यासाठीची सर्वात सुपीक जागा ती आहे असे मानून चला.
तुम्ही जिथे आहात तिथे यापैकी काय होते..?
............................
सचिन दाभाडे
Wednesday, April 15, 2020
युव्हल नोआ हरारीचे सेपियन्स - मानवी उत्क्रांतीची उत्कंठापूर्वक पुनर्रचना
Friday, April 10, 2020
'फ्राईड'
'माझ्यावर पुस्तक कृपया लिहू नकोस तर माझ्यामुळे पुस्तक लिही'. नेटफ्लिक्स वरील 'फ्राईड' या सिग्मड फ्राईड च्या जीवनावर आधारित सुरवातीच्या कालखंडातील प्लॉट असलेली या सिरीजमधील हे फ्राईडच्या पेशंटच्या तोंडून आलेले वाक्य पूर्ण सिरीज कशी समजून घ्यायचीय याचा दृष्टिकोनच देऊन जाते. पूर्ण सिरीजमध्ये ही केस सोडवताना शेवटी त्यामध्ये भावनिकरित्या गुंतलेला फ्राईड त्याच्या पेशंटला म्हणतो, तुझा फोटो सरकारने पेपरमध्ये छापून तुला अटक करण्याचे सांगितलंय, तर आता तू काय करशील, तेंव्हा पेशंट म्हणते, की आता मला लोक ओळखतील त्यामुळे मी आता खरी फ्री झालीय, आता कुठलाही नकारात्मक विचार मला ड्राईव्ह करू शकणार नाही कारण तो विचार आता माझी शक्ती झालाय, कारण तो विचार नकारात्मक आहे हे मी ओळखलंय आणि हे झालय तुझ्यामुळेच. मी एक केस म्हणून तुझ्या आयुष्यासाठी आता संपली पाहिजे त्यामुळे तू दुसऱ्या केससाठी तयार रहा.
सगळ्या भागांपैकी शेवट मला खूपच आवडला आणि अनेक अर्थाने प्रेरणा देणारा वाटला. घरी येत असतांना फ्राईडच्या डोक्यात असलेला विचार स्पष्ट होत जातात. जे काँशिअस आणि सबकाँशिअस विचारांचे सुंदर असे स्पष्टीकरण आहे. माणसाच्या सबकाँशिअस मेंदूमध्ये त्यांच्या न बोलल्या गेल्याला अव्यक्त अश्या अनेक इच्छा, आकांशा, विचार असतात आणि त्या तुम्हाला तुमच्या नकळत आकार देत असतात. अंधाऱ्या खोलीत तुम्हाला काही दिसत नाही म्हणजे तिथे काहीच नाही असे होत नाही फक्त त्या तुम्हाला अंधारात दिसत नाही एवढेच. तसेच तुमच्या उघड्या डोळ्यांनी प्रकाशात दिसत असलेला भाग हा तुमचा काँशिअस भाग आहे. तर अंधारात न दिसणारा हा अनकाँशिअस भाग. हाच न दिसणारा भाग मोठया प्रमाणावर तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो. तुमच्या अनेक कृतीवर प्रभाव पाडत असतो. जर या अंधाऱ्या भागाला आपल्याला बघता आले किंवा ओळखता आले, तर आपल्याला आपल्यातील कमकुवत बाबींचे स्पष्टीकरणे मिळतील.
मानसशास्त्राचा इतिहास हा तसा फार जुना असा नाही साधारणतः 200 वर्षाची शास्त्रीय पार्श्वभूमी असलेली ही विद्याशाखा फ्राईड ने 360 डिग्री मध्ये बदलवली आहे. भानामती, जादूटोणा, भुताचा प्रभाव यासारख्या सागळ्या अज्ञानी कल्पनांच्या चौकटीत मानसिक रोग्यांचे निदान व उपचार अडकलेले असतांना एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मध्य युरोपात त्यांच्यावर होणारे उपचारही अतिशय क्रूर अशा स्वरूपाचेच होते आणि अश्याच कालखंडाचे बरचसं चित्रण या सिरीजमध्ये आपल्याला दिसते.
सिगमंड फ्राईड ने सुरवातीला हिप्नॉसिसच्या वापराकडून (फ्राईड करिअरच्या सुरवातीला हिप्नॉसिसच्या प्रभावात आला होता पण नंतर त्याला या अभ्यासात शास्त्रीयता वाटली नाही) सबकाँशिअस माईंडच्या विश्लेषणाकडे वळवलेला मोर्चा हा मानसशास्त्रीय अभ्यासाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरणार होता आणि त्यातून अभ्यासकांची एक मोठी परंपरा उभी राहिली. फ्राईडच्या हिप्नॉसिसच्या अभ्यासाच्या मध्यावर कुठेतरी एका घटनेवर आधारलेली ही कथा संपते. ज्यात फ्राईडच्या वैयक्तिक आयुष्याचे काही तथ्ये ही दाखवण्यात आलीय. या क्रांतिकारक मानसशास्त्रज्ञाच्या सुरुवातीच्या आयुष्यातील भागावर आधारित असलेली ही वेब सिरीज बघावी अशीच आहे.
.....................
सचिन दाभाडे
Wednesday, April 1, 2020
'यु टर्न'
हल्ले अटॅक लोकांचे मृत्यू हा माहितीचा भाग म्हणून घ्यावा की संवेदनेचा भाग म्हणून घ्यावा यावर वेगवेगळी मते असू शकतात. पण याही उपर गेल्या महिन्याभरापासून आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या च घरात एकदुसऱ्याला बाहेर न पडण्याचा आणि त्याचे भयानक दुष्परिणाम आपापल्या पद्धतीने सांगताय एकमेकांना सांगण्याचे प्रमाण वाढलंय हे लक्षात येण्यासारखं आहे. माणस एकमेकांच्या संपर्कात आली तर जिवाला धोका आहे, बाहेर जाण्यास बंदी आहे, सगळी ऑफिसेस संस्था बंद आहे, देश थांबलाय...!
हे सगळं स्वप्नं नसून खरचं घडतंय. दुपारी समजा झोपलेलो असलो आणि जाग जेंव्हा येते तेंव्हा असे वाटतंय की हा स्वप्नाचाच भाग होता पण खरं म्हणजे झोपेमुळेच तर या वास्तवातून ब्रेक मिळाला होता हे थोड्या वेळात समजते. पृथ्वीच्या पाठीवर एवढी भयंकर युद्धे झालीय अगदी मागच्याच शतकात दोन भयंकर जीवघेणी महायुद्ध झालीय. या महायुध्दात हजारो माणसे मेलीत, पण त्याबद्दल वाचतांना किंवा माहिती घेतांना याचा वास्तवाशी संबंध असल्याचा फील आला नाही.कुठेतरी दुसऱ्या जगाशी संबंधित किंवा एखादा हॉलीवूडचा मुव्ही बघतांना जे नावीन्य किंवा थ्रिल याव असच काहीतरी या घटना घडतांना रिस्पॉन्स गेला असेल.
काही प्रश्नांची उत्तरे लिहायचीय किंवा, यावर्षात काय झालं, याचं ज्ञान मला आहे यापलीकडे या घटनांत काही असेल अस वाटलंच नाही किंवा वाटण्याचे कारणही नसेल कदाचित. तेलावरून अनेक युद्धे, इराण इराक युद्ध, गल्फ वॉर, कुवेत वॉर, नायगर डेल्ट मध्ये सध्या चालू असलेले झगडे या आणि अशांच्या बातम्या लहानपनापासून पेपर मध्ये वाचायला मिळायच्या. या युद्धात माणसं मरायच्या खबरा यायच्या. रशिया अमेरिकेच्या शीत युद्धाच्या परिणामामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रे कशी बळी पडताय, वेगवेगळ्या दबाव तंत्रामुळे युद्धाची भयंकर साधने निर्माण केली जाताय याच्या बातम्या नेहमी कुठल्यानं कुठल्या माध्यमातून येताच राहिल्याय.
चीन पाकिस्थानशी युध्दाच्या बाता तर चहाच्या घोटासोबत कित्येक वेळा मित्रांसोबत मारल्याचे आठवतेय त्यात किती माणसांची कुर्बानी देऊन आपण परिणामाचा अंदाजही मनातल्या मनात तयार केलाय नियोजन. पण एवढं सगळं भयंकर घडत असतांना किंवा त्यावर विचार करत असताना मला भीती अशी कधी वाटलीच नाही किंवा वाटायचं कारण नव्हते कारण ती माहिती होती. एक विचार असा ही होता, एवढी लोकसंख्या वाढलीय, तर संसाधन अपुरे पडायला लागल्यावर माणसे काय करतील. एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या कशा प्रकारच्या असतील याचाही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून झालेला होता.
जग हे तिसऱ्या महायुद्धापर्यंत येऊन थांबलय. ते पाण्यासाठी होईल आणि या युद्धात अणुबॉम्बचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊन सर्व पृथ्वी नष्ट होईल हे मी माझ्या मित्रांना चटणीसोबत पापड लावून खातांना अगदी कन्फर्म सांगितलंय आणि ते सांगताना मला भीती किंवा अस्वस्थतेचे भाव होते असे काही आठवत नाही.
माणसे मरतात, त्यांना कोण मारतो, कशासाठी मारतो हा भीतीचा विषय नसून ज्ञान मिळविण्याचा भाग आहे. तोच पुढेपुढे विकसित होत गेला. आर्थिक जग, विकास, जागतिकीकरण, खाजगीकरण, बेकारी, बँका, विविध राज्ये व त्याचे मुद्दे याबाबद्दलचे ज्ञान वाढत होते. मध्येच फटीकनेस आला की पर्यावरण आणि त्याची गरज यावरही थोडा वेळात वेळ काढून विचार केलाय.
जर भविष्यात जग लढलेच तर कुठल्या साधनांच्या आधारे लढेल, यावर अधिक अपडेट होण्याचा माझा प्रयत्न मला व्यापारातून देश एकमेकांनाची गोची करून वेगवेगळ्या मार्गे गळचेपी करतील इथपासून, बायोवॉरही भविष्यात कधीतरी होणारी घटना आहेच, ते होऊ शकते आणि हे सांगताना जर्मनी, अमेरिका, चीन, रशिया, स्पेन सारखे राष्ट्रे कशी बायोकेमिकल वेपन्स करण्यात गुंतली आहे, याबद्द्ल सांगून मी अपडेट आहे याची जाणीव होऊन प्रेरित झाल्याचं मला नक्की आठवतंय.
म्हणजे भीती अशी कधी वाटलीच नाही. अधिक माहिती, अधिक डेटा, सगळ्यांच माहितीच वेळोवेळी स्मरण, योग्य वेळी त्याचं परफेक्ट सादरीकरण. सगळं कसं अगदी सराईतपणे.
मागचे 20 दिवसही तसे काही वेगळे नाहीत.पूर्ण घरात आहे. फक्त काही महत्वाचे बदल आहेत. नकारात्मक बातम्यापासून दूर राहता यावे म्हणून मी माहिती मिळवणे बंद केलेय. आणि हो भीती वाटायला लागलीय.
.........................
सचिन दाभाडे











