Wednesday, April 1, 2020

'यु टर्न'


हल्ले अटॅक लोकांचे मृत्यू हा माहितीचा भाग म्हणून घ्यावा की संवेदनेचा भाग म्हणून घ्यावा यावर वेगवेगळी मते असू शकतात. पण याही उपर गेल्या महिन्याभरापासून आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या च घरात एकदुसऱ्याला बाहेर न पडण्याचा आणि त्याचे भयानक दुष्परिणाम आपापल्या पद्धतीने सांगताय एकमेकांना सांगण्याचे प्रमाण वाढलंय हे लक्षात येण्यासारखं आहे. माणस एकमेकांच्या संपर्कात आली तर जिवाला धोका आहे, बाहेर जाण्यास बंदी आहे, सगळी ऑफिसेस संस्था बंद आहे, देश थांबलाय...!

हे सगळं स्वप्नं नसून खरचं घडतंय. दुपारी समजा झोपलेलो असलो आणि जाग जेंव्हा येते तेंव्हा असे वाटतंय की हा स्वप्नाचाच भाग होता पण खरं म्हणजे झोपेमुळेच तर या वास्तवातून ब्रेक मिळाला होता हे थोड्या वेळात समजते. पृथ्वीच्या पाठीवर एवढी भयंकर युद्धे झालीय अगदी मागच्याच शतकात दोन भयंकर जीवघेणी महायुद्ध झालीय. या महायुध्दात हजारो माणसे मेलीत, पण त्याबद्दल वाचतांना किंवा माहिती घेतांना याचा वास्तवाशी संबंध असल्याचा फील आला नाही.कुठेतरी दुसऱ्या जगाशी संबंधित किंवा एखादा हॉलीवूडचा मुव्ही बघतांना जे नावीन्य किंवा थ्रिल याव असच काहीतरी या घटना घडतांना रिस्पॉन्स गेला असेल.

काही प्रश्नांची उत्तरे लिहायचीय किंवा, यावर्षात काय झालं, याचं ज्ञान मला आहे यापलीकडे या घटनांत काही असेल अस वाटलंच नाही किंवा वाटण्याचे कारणही नसेल कदाचित. तेलावरून अनेक युद्धे, इराण इराक युद्ध, गल्फ वॉर, कुवेत वॉर, नायगर डेल्ट मध्ये सध्या चालू असलेले झगडे या आणि अशांच्या बातम्या लहानपनापासून पेपर मध्ये वाचायला मिळायच्या. या युद्धात माणसं मरायच्या खबरा यायच्या. रशिया अमेरिकेच्या शीत युद्धाच्या परिणामामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रे कशी बळी पडताय, वेगवेगळ्या दबाव तंत्रामुळे युद्धाची भयंकर साधने निर्माण केली जाताय याच्या बातम्या नेहमी कुठल्यानं कुठल्या माध्यमातून येताच राहिल्याय.

चीन पाकिस्थानशी युध्दाच्या बाता तर चहाच्या घोटासोबत कित्येक वेळा मित्रांसोबत मारल्याचे आठवतेय त्यात किती माणसांची कुर्बानी देऊन आपण परिणामाचा अंदाजही मनातल्या मनात तयार केलाय नियोजन. पण एवढं सगळं भयंकर घडत असतांना किंवा त्यावर विचार करत असताना मला भीती अशी कधी वाटलीच नाही किंवा वाटायचं कारण नव्हते कारण ती माहिती होती. एक विचार असा ही होता, एवढी लोकसंख्या वाढलीय, तर संसाधन अपुरे पडायला लागल्यावर माणसे काय करतील. एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या कशा प्रकारच्या असतील याचाही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून झालेला होता.

जग हे तिसऱ्या महायुद्धापर्यंत येऊन थांबलय. ते पाण्यासाठी होईल आणि या युद्धात अणुबॉम्बचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊन सर्व पृथ्वी नष्ट होईल हे मी माझ्या मित्रांना चटणीसोबत पापड लावून खातांना अगदी कन्फर्म सांगितलंय आणि ते सांगताना मला भीती किंवा अस्वस्थतेचे भाव होते असे काही आठवत नाही.

माणसे मरतात, त्यांना कोण मारतो, कशासाठी मारतो हा भीतीचा विषय नसून ज्ञान मिळविण्याचा भाग आहे. तोच पुढेपुढे विकसित होत गेला. आर्थिक जग, विकास, जागतिकीकरण, खाजगीकरण, बेकारी, बँका, विविध राज्ये व त्याचे मुद्दे याबाबद्दलचे ज्ञान वाढत होते. मध्येच फटीकनेस आला की पर्यावरण आणि त्याची गरज यावरही थोडा वेळात वेळ काढून विचार केलाय.

जर भविष्यात जग लढलेच तर कुठल्या साधनांच्या आधारे लढेल, यावर अधिक अपडेट होण्याचा माझा प्रयत्न मला व्यापारातून देश एकमेकांनाची गोची करून वेगवेगळ्या मार्गे गळचेपी करतील इथपासून, बायोवॉरही भविष्यात कधीतरी होणारी घटना आहेच, ते होऊ शकते आणि हे सांगताना जर्मनी, अमेरिका, चीन, रशिया, स्पेन सारखे राष्ट्रे कशी बायोकेमिकल वेपन्स करण्यात गुंतली आहे, याबद्द्ल सांगून मी अपडेट आहे याची जाणीव होऊन प्रेरित झाल्याचं मला नक्की आठवतंय.

म्हणजे भीती अशी कधी वाटलीच नाही. अधिक माहिती, अधिक डेटा, सगळ्यांच माहितीच वेळोवेळी स्मरण, योग्य वेळी त्याचं परफेक्ट सादरीकरण. सगळं कसं अगदी सराईतपणे.

मागचे 20 दिवसही तसे काही वेगळे नाहीत.पूर्ण घरात आहे. फक्त काही महत्वाचे बदल आहेत.  नकारात्मक बातम्यापासून दूर राहता यावे म्हणून मी माहिती मिळवणे बंद केलेय. आणि हो भीती वाटायला लागलीय.

.........................
सचिन दाभाडे

No comments:

Post a Comment