Sunday, July 30, 2017

कॉर्पोरेटचे "अभिमन्यू"





अष्टो प्रहर कष्ट करून नष्ट होणाऱ्यासाठी नवनिर्मिती हे स्वप्नच आहे. बऱ्याच जणांना नवनिर्मिती आणि पुनर्निर्मिती यामधील फरक कळता कळता आपबितीला सामोरे जावे लागते. म्हणून  क्षमतांचा अंदाज बांधने तसे अवघडच, त्यासाठी स्वतःला आजमावे लागते, भट्टीत झोकावे लागते, भूतकाळातील हस्तिदंती मनोऱ्यातुन भविष्याची गणिते बांधणाऱ्याला इतिहास डायबिटीस देतो.  खाताही येत नाही, आणि पाहताही येत नाही. क्षमता आहे हे नुसतं तुमच्या विचारांनाच माहित असून भागत नाही तर कृतीमधून ते व्यवस्थेच्या प्रत्ययाला ही यावे लागते. आपल्याला झालेली जाणीव ही आपल्या स्वतःच्या जेनेटिक्समधील आहे की फक्त फोनेटिक्समधील; की मग आजूबाजूचा प्रभाव गांजतोय. 'निखरना है तो बिखरना है' या तत्वात बसवण्यासाठी आपल्या  निर्णयाला धमक देता देता, क्षमतेला चमक देणे जमले पाहिजे. 

हे चेक करण्यासाठी चीनचा तत्ववेत्ता, लाओत्से २५०० वर्षांपूर्वी एक सूत्र सांगतोय "Without Darkness, there can be no Light." म्हणजे काय तर अंधार हा तुम्हाला प्रकाशाची जाणीव करून देणारा एकमेव मार्ग. बाहेरचा प्रकाश आतल्या अंधाराची जाणीव होऊ देत नाही आणि आतला प्रकाश बाहेरच्या अंधाराची जाणीव होऊ देत नाही म्हणून कुठला प्रकाश निवडायचा ते काळजीपूर्वक ठरवा.  करिअरच्या राजमार्गावर येण्यासाठी काही थाटामाटात तर काही रडत पडत कॉर्पोरेट, मोठमोठ्या बिसिनेस फर्म, व्यवस्थेयत प्रवेश मिळवतात; पण आपल्या इच्छा, क्षमता आणि कंपनीच्या अपेक्षा यांचा व्यवस्थित ताळेबंद बांधता न आल्याने काही घूसल्यावर आतमध्ये लढत राहतात, काही बाहेरच्या दिशेने वेगाने उचंबळून पुन्हा नकळत आतल्या दिशेने गिरकी घेतात आणि गिरक्याच घेत राहतात. काही आतील सूत्रे  हातात घेतात, सक्षम होतात, तर काही बाहेर येण्याच्या स्वप्नात आतमध्ये कष्ट करत राहतात .. शेवट पर्यंत ...! 
हे सर्व अभिमन्यू हेच आपल्या भारतीय कॉर्पोरेट इंडस्ट्रीचे निर्धारकही आहेत आणि अडचणीही. 

बरेच लोक फिल्मी स्टईलने चक्रव्यूह तोडतात आणि मासोळीसारखे बाहेर येऊन तरफडत राहतात. धड बाहेरही थांबता येत नाही, धड आतही परतता येत नाही, हे अभिमन्यू म्हणजे बाहेर पडून एका स्वरचित चक्रव्यूव्हाची शिकार होणारे नावाचेच शरीफ. ही मंडळी जास्त प्रमाणात १९८० ते २००० च्या काळात जन्मलेली, यातली बरीच मिल्लेनिअलही आहे, म्हणजे जे शिकले ते अप्लाय करता येत नाही.जे अप्लाय करावे लागले ते पूर्ण शिकता आले नाही. जेवढे शिकले ते सोडता येत नाही आणि नवीन शिकण्यासाठी वेळ ही नाही .. ज्यांना वेळ आहे त्यांची मानसिकता नाही आणि ज्यांची मानसिकता आहे त्यांना प्रापंचिकता....! एकूण काय तर बऱ्यापैकी गोंधळच... यातून बाहेर पडायचे म्हणजे नेमके कशातून बाहेर पडायचे हा येणाऱ्या दशकातील मोठा प्रश्न...!       

याचे उत्तर कॉलेक्टिव्ह पातळीवर कंपन्याच शोधताय. अमेरिकन थियरी "Y" ही एम्प्लॉयी यांना कामचुकार आणि आळशी समजून कामाची प्लॅनींग करते  आणि म्हणून माणसाच्या शक्तीची आणि प्रेरणेची समजच नकारात्मक आहे.  ज्यामध्ये कामे सोपववताना जबरदस्ती आणि इच्छा विचारात न  घेणे क्रमप्राप्तच आहे. याउलट जपानी उधोगपती आणि विचारवंतांनी आणलेली थेअरी "x" ही अमेरिकन मॅनेजमेंट आणि मानसिकतेच्या बरेच पाऊले पुढे चालून गेलीय. या थिअरीने माणसे ही आळशी आणि कामचुकार बनण्याची करणीमिमांसा केली आहे आणि त्याआधारावरच कामाचे ठिकाण उत्साही, सुंदर क्रिएटिव्ह असले तर लोकांना  कामचे ठिकाण आपलेसे  होईल, आणि कामाच्या पद्धती बदलल्या की लोक अधिक क्रियाशील आणि प्रोडक्टीव्ह होतील , याची  रचना करून आपल्या उद्योगाला थेअरी "Y", म्हणजेच अमेरिकन कंपन्यांच्या नियोजन पद्धतीच्या कचाट्यातून सोडवले. जॅपनीझ लोकांच्या या "पीपल" आणि "क्वालिटी" मॅनॅजमेण्टच्या कल्पनाच पश्चिमेकडील देशांच्या नियोजनाच्या सर्व तत्वांना आणि गृहीतकांना आव्हान देणाऱ्या होत्या. म्हणूनच याचा मध्य साधणाऱ्या थेअरी "Z" ची मांडणी करावी लागली जी नियोजनातील दोन्ही पद्धतीतील मिश्रण आहे. 

ही नवीन थेअरी म्हणजेच आपल्यामधील एक्सलेन्सचा शोध आणि नवनिर्मितीच्या सर्वोच्य शिखराकडे सतत प्रवास. यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे प्रयत्न विविध उद्योग योग्य प्रमाणात आपल्या एम्पल्योईंना सक्षम करण्यासाठी करत आहे; त्याचे उदाहरण म्हणजे कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त  होत असणारे learning & development, organizational excellence team,employee relation team अश्या प्रकारचे विभाग म्हणजे ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंटला या सर्वांच्या गरजेची झालेली जाणीव. 

कुठल्याही क्षेत्रात असा, पण क्षमतेचा शोध घेत राहणे आणि त्याचा विकास करणे हे एम्प्लॉयी आणि एम्पल्योऐर या  दोघांसाठी आता  महत्वपूर्ण बनले आहे. येणाऱ्या १० वर्षात आश्या गोंधळलेल्या आणि कुंपणावरील मनुष्यबळाचे विस्थापन थांबवायचे असल्यास एम्प्लॉयी केंद्रस्थानी येणे गरजेचे आहे आणि व्यक्ती जिथे आहे तिथेच त्याला हवे असणारे विश्व् निर्माण करुन कॉस्ट वाचवून सर्व संसाधने पुरवण्याचे आव्हान येणाऱ्या काळात कंपन्या आणि व्यक्तींसमोर आहे. हा स्थित्यंतराचा काळ आहे हे जितके खरे तितकेच हे ही खरे की हा सुवर्णमध्य साधण्यासाठी वेळही हीच योग्य, अन्यथा हे आधुनिक अभिमन्यू हेच आपल्या देशी नियोजनापुढील सर्वात मोठे आवाहन ठरत राहतील.   


सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade.com
Sachin.14d@gmail.com
8390130362     










          

Thursday, July 27, 2017

माणसाचा देव व्हावा..........!



रात्री हायवे वरून जातांना  एक भली मोठी जाहिरात  एका मोठ्या बोर्डवर  झळकत होती. जेवढी बिल्डिंग मोठी होती तिच्या कमीत कमी अर्ध्या आकाराचा हा बोर्ड तिच्यावर उभा केलेला होता. मी साधारणतः रात्री १० ला उशिराने घरी जात होतो आजूबाजूला काळाकुट्ट अंधार, रस्त्यावरील लाईटही  मिणमिणत्या प्रकाशत  आपला कसाबसा जीव काढत होते, पण त्याही अंधारात त्या उंच बिल्डींग वरील भला मोठा बोर्ड माझे लक्ष वेधून घेत होता. बोर्डच्या वरील बाजूने तीन मोठ्या लोखंडी रॉड लटकावून त्यावर दोन कोपऱ्यावर दोन आणि मधात एक असे तीन लाईट बोर्डाकडे तोंड करून फिक्स करण्यात आले होते. गंमत अशी होती कि त्या लाइटमुळे आजूबाजूचे काही दिसत नव्हते पण तो बोर्ड मात्र स्पष्ट दिसत होता.

माझ्या आणि बोर्डामध्ये बरेच अंतर होते, आणखी बरेच बोर्डही रस्त्यावर लावलेले होते, पण त्यातला एकही मला दिसला नाही आणि याला मी टाळू शकलो नाही. माझ्या आणि त्या मार्केटिंग बोर्ड मधील अंधार चिरत माझी नजर कुठल्याही अडचणीशिवाय त्याबोर्डापर्यंत पोहचू शकत होती. त्या बोर्डानी माझ्या आणि त्याच्या मधील भरून राहिलेला अंधार दूर करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. त्यांनी एकाच काळजी घेतली, या तीनही लाईटचा फोकस फक्त बोर्डावरचा पडेल याची.

प्रचंड अंधार आपल्या आणि सूर्यामध्ये असतानाही तो आपल्याला दिसतो,नव्हे आपल्या डोळ्यांनी बघताही येत नाही एवढ्या प्रकाशाने तळतळतो, कारण तो प्रकाशाने आधी स्वत जळतो. आपल्याला प्रकाशित करावे हा त्याचा हेतूही नाही आणि गरजही नाही, तो फक्त त्याचे काम करतो. आपण स्वतःहोऊन त्याच्याकडून प्रकाशित होऊन घेतो. दुसऱ्याला प्रकाशित करण्याच्या प्रयत्नात स्वतःतील अंधकार मिटवण्याचीही जबाबदारी घ्या ... एकाच करा स्वयंप्रकाशित व्हा...! अश्या स्वयंप्रकाशित लोकांचे जत्थे हजारो सूर्य निर्माण करतील आणि आणि प्रकाशाचे स्वप्नं पाहतील.

कुणीतरी लिहून ठेवलय;

स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी...

स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
माणसाचा देव व्हावा..........




Regards,
Sachin Dabhade
Management & Corporate Trainer
Director-ASK Training Solution
Web- www.sachindabhade.com
Mob - 8390130362
ask@sachindabhade.com
sachin.14d@gmail.com