Monday, May 30, 2016




भुवन लाकडाची फळी घ्येउन गावात असलेल्या मोकळ्या जागेत येतो, सर्वांच्या प्रश्नार्थक नजरा भुवन वर खिळलेल्या, भुवन नेहमी प्रमाणे आपल्या सहज सोप्या लकबीत गावासमोर नवीन प्रात्यक्षिकांच्या तयारीसाठी सज्ज होताना आपल्या खुमखुमी असलेल्या भाषेत नविन येणाऱ्या आव्हानात संधी शोधन्याच्या त्याच्या पावित्र्यात बोलू लागतो. गोलू ला बॉल पकडायला सांगतो. किती सोप आहे हे सांगताना तो गोलुचि इच्छाशक्ति व् प्रेरणा वाढवत असतो. बॉल मारण्याच्या पावित्र्यात येऊन गोलुला बॉल टाकायला सांगतो, त्याच्याकडे पाहणाऱ्यांच्या नजरेत एकाच वेळेला निराशा, राग, अस्वस्थता....! या सगळ्याकडे थोडेसे दुर्लक्ष करत त्याचे लक्ष्य बॉलकड़े. गोलू वेगात बॉल भुवनच्या दिशेने भिरकावतो आणि त्याला उत्तर म्हणून आपल्या पूर्ण ताकदीनिशी भुवन फळी ने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण बॉल फळी ला न लागता निसटतो, भुवनच्या चेहऱ्यावर निराशेची थोडीशी लकेर, निसटलेला बॉल गौरीला आणायला सांगतो, तेवढ्यात गौरीच्या वडिलांकडून तिला भुवनला मदत करण्यास विरोध .

दुसऱ्या प्रयत्नसाठी पुन्हा भुवनची सज्जता .. एकुलता एक व्यक्ती गोलू ची साथ सुटू नये म्हणून गोलुला पुन्हा विश्वास देत बॉल फेकायला सांगतो, यावेळी पुन्हा बऱ्याच नजरेत थोड़ी फार आशा, काही साशंक, काही अस्वस्थ......आणि काही घाबरलेले ,सगळ्याच अर्धवट नजरा भुवनच्या पवित्र्याकडे...आणि भुवन पुन्हा प्रात्यक्षिकाच्या पावित्र्यात, पुन्हा बॉल भुवनच्या दिशेने आणि पूर्ण ताकद लावून यावेळेला पहिल्यांदा गेलेली इज्जत वाचवण्यासाठी भुवनचे फळी फिरवणे…. आणि पुन्हा गंभीर निराशा… ! हातातून फळी निसटून यावेळेला दूर जाऊंन पड़ते. आता मात्र बऱ्याच भूवया उंचावतत, अस्वाथता टोकाला, पराभव... पराभव... असेच काहीसे ….!

गोंधळलेला भुवन , बोललेला पूर्ण करू न शकलेला भुवन , अपयशी भुवन , अपरिपूर्ण भुवन , असक्षम भुवन, स्वताच्या स्वाभिमानासाठी सगळ्या गावकऱ्यांच्या आयुष्याला अडचणीत आणणारा भुवन; नजर चुकवत पुन्हा फळी कड़े जायला निघतो. आता हा घरी जाऊन फळी एका कोपऱ्यात ठेवून फुकाचे प्रात्याक्षिके नक्कीच करणार नाही असे एखाद्याच्या डोक्यात…। पुन्हा कॅमेरा भुवनकडे, फळी घामाने निसटल्याचे कारण देताना, अरे हा तर पुन्हा मैदानात, लोक आता हे अशक्य आहे अश्या भावत पुन्हा आपापल्या कामात लागताना, काहीजण आपण दुर्लक्ष करतोय याचे बेमालूम नाटक करताना, पण कान मात्र त्याच्या पुढच्या वाल्गनेकडे, त्याच्या शब्दाकडे, आणि अर्थात त्याच्या कृतीकडे.… !

तो पुन्हा फळी उचलताना काय म्हणतो हे ऐकण्यास, बघण्यास जणूकाही सर्वच इक्छुक. पुन्हा तो फळी उचलतो आता मात्र फळी हातातून सटकु नए म्हणून मातीत हात पूर्ण भरून घेतो, यावेळी बऱ्याच मुठी अवळलेल्या, नजरा ताणलेल्या, भुवया उंचावलेल्या, भुवनने उगारलेल्या फळी मध्ये भविष्य जणू. भुवन काय करतोय यांच्याशी आम्हाला कही घेणे नाही हा आविर्भाव सगळ्यांच्या नजरेतून गायबच, यावेळी. गोलू यावेळेला बॉल टाकताना जास्त सतर्क, आणि भुवनचि गर्जना "ईस बार मारेंगे और बहोत दूर तक मरेंगे ", सर्वांचे श्वास गळ्यात
आणि वेगाने येणाऱ्या बॉलला फळीने एक जबरदस्त स्ट्रोक......!


सचिन दाभाडे….


आपल्याला माहिती असलेले दुसर्यांना सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे माहिती देत असतांना "ही माहिती माझ्याकडे आहे बघा जर तुम्हाला तिचा उपयोग झाला तर" ही एक पध्दत आणि दुसरी म्हणजे "तुम्हाला ही गोष्ट माहित कशी नाही; आश्चर्य आहे, तुम्ही या मार्गाने जायला हवे ". पहिल्या पद्धतीत समोरच्या व्यक्तीच्या क्षमतेला आव्हान न करता आपल्याकडे जे काही आहे ते विवेकवादी पद्धतीने समोर ठेवलेले असते, त्यात समोरच्याच्या वाक्याशी आपण केलेल्या वाक्याची बरोबरी नसते आणि ते स्वीकारले गेलेच पाहिजे असा अट्टाहास नसतो. कारण समोरच्याच्या मेंदूने घटना आणि माहिती वेगळ्या प्रकारे आत्मसात केलेली असणार आणि तिचे प्रक्षेपण ही वेगळ्या प्रकारे होत असणार किंवा होऊ शकते हे अभिप्रेत असते. यातून होणारे मुद्द्याचे आदानप्रदान (content transaction) हे चर्चा च्या माध्यमातून सुरु होऊन संवादाच्या दिशेने प्रवास करत राहते आणि याद्वारेच व्यक्ती शिकण्याची प्रक्रियेत येतात ते शिकतात(learning), समोरच्याला काय म्हणायचे आहे हे समजूनही (understanding) घ्येतात. दुसऱ्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत कळत नकळत, अप्रत्यक्षरित्या, किंवा कधी कधी जाणूनबुजून समोरच्याच्या माहिती संकलित करण्याच्या किवा घटना समजून घ्येण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात येते, अश्या वेळी माहितीचे आदानप्रदान चर्चेत रुपांतरीत होत नाही त्यामुळे अर्थात ते संवादापासूनही कोसो दूर असते.

आता अश्या प्रक्रियेतून शिकण्याची गरज कुठल्याच स्थरावर निर्माण होणार नाही हे वेगळ सांगायची गरज नाही. आपण आपले मत मांडत असतांना (ज्याला आपण बऱ्याच वेळा चर्चा असे स्वतःच संबोधतो) आपल्या बोलण्याच्या पद्धतीत वरील दोनपैकी कुठले भाव असतात याचे परीक्षण करून बघा; पहिला की दुसरा ? आपण बोलत असलेल्या मुद्यातून समोरच्याने समजून घ्यावे की शिकून घ्यावे की मग फक्तच ऐकून घ्यावे हा आपला उद्देशच आपली पद्धत कुठली असली पाहिजे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करेल, जे शिक्षक मुलांना शिकवतात, जे प्राध्यापक मुलांशी ज्ञानाचा व्यवहार करतात, जे विद्वान चर्चेत आपले म्हणणे मांडत असतात या सर्वांचा हेतू जर बघितला तर साधारणपणे पहिल्या पद्धतीने आपले म्हणणे मांडणे अपेक्षित आहे, परंतु बऱ्याच वेळेला आपला विचार मांडताना किंवा एखाद्याला मार्गदर्शन करतांना जेव्हा व्यक्ती दुसरया पद्धतीने आपले म्हणणे मांडत असेल तेव्हा अस्वस्थता, तुलना,वाद, द्वेष, यांची बीजे पेरली जाणे अपरिहार्य, याउप्परही काही आक्रमक होऊन ज्ञान प्रसार करतांना दिसतात.एकाच वेळी मी लोकांना ज्ञान व माहिती पुरवतोय आणि दुसरीकडे आक्रमक होतोय हेच मुळात परस्पर विरोधी आहे. त्यामुळे लोकांना काही देण्याआगोदर आपला हेतू तपासा कारण तो काहीही असला तरी पद्धत चुकली कि तुम्ही नाकारले जाणार,आणि नाकारले च जाणार असाल तर पद्धत बदलायला काय हरकत आहे, लओत्से म्हणतो "दुसर्यांना ओळखणे हि विद्वत्ता आहे पण स्वताला ओळखणे हे ज्ञान". अर्थात मलाही हे जे वाटले ते ही पटलेच पाहिजे असे नाही, फक्त मला असे वाटते, एवढेच …!

सचिन दाभाडे …

Thursday, May 26, 2016


टाईम्स ऑफ इंडिया मध्ये आज एक न्यूझ वाचली ८ महिन्यापूर्वी सुरु झालेली pulse कॅन्डी, या महिन्यात १०० करोड चा टप्पा गाठून गेली. योग्य जागा बघून आणि गरज ओळखून आपल्या प्रोडक्टची योग्य प्लेसमेंट करून प्रेरणा देणारे अप्रतिम उदाहरण. कच्चा आम अशी branding करून हार्ड बॉईल्ड प्रकारात येणारी कॅन्डी ही उद्योगात नवीन येणाऱ्या सोबतच आईडिया (Concept) मध्ये स्वतःला नाविन्यपूर्ण ठेवणाऱ्या प्रत्येकाला आणि चिरेबंदी झालेल्या मार्केटला फोडून, कसे स्वतःचे स्थान एवढ्या कमी अवधीत निर्माण केल्या जाऊ शकते याचे हे जबरदस्त उदाहरण … ! एकूणच हार्ड बॉईल्ड प्रकारातील जवळपास २ हजार करोडच्या मार्केटला २५% ग्रोथमध्ये महत्वपूर्ण हातभार या प्रोडक्ट ने लावलाय, मला आनंद या गोष्टीचा आहे की जे लोक नाविन्याची आणि गरजेची चव ओळखतात, भारतीय लोक त्याची “चव” ठेवतात आणि हे नेहमीच सिद्ध होत आलंय.

रस्ते बंद झाल्यावर आपण काय करतो, प्रत्येक जन आपल्या क्षमतेनुसार परिस्थितीचा मुकाबला करतो काही थांबतात, बदलतात, समजुन घ्येतात, ओरडतात, घाबरतात, घबरवतात, पळतात आणि बरयाच इतर प्रतिक्रिया ...... आणि काही लोक नविन रस्ताच बांधायला घ्येतात. प्रसिद्ध लेखक, कवयत्री 'माया अन्जेलो' आपल्या आत्मचरित्रात ( The Best Advice I Ever Got) तीला तिच्या आजीकडून आयुष्यात मिळालेल्या महत्वपूर्ण सल्ल्याबद्दल सांगते, "जगाने तुला अशा मार्गावर जबरदस्ती ढकलले जे तुला करायला मुळीच आवडत नाही, जेव्हा तू समोर बघतेय आणि तुला सांगण्यात आलेले गंतव्य (destination) तुला बिलकुल अपेक्षित नाही, आणि जेव्हा तू मागे वळून पाहते तेंव्हा जिथून तू सोडून आली आहेस तिथे तुला मुळीच जायचे नाहीये, तेव्हा; रस्त्यावरून बाहेर पड आणि स्वतःचा मार्ग बांध".

ज्यांच्या मार्गात दगड आहेत त्यांनी ते बाजूला करायच्या फंदात पडत बसु नका; एवढंच लक्षात असु द्या ... नविन रस्ता तयार करायला पहिल्या थरावर हीच दगड कामाला येतील....!

सचिन दाभाडे ...

बर्कशायर हाथवे चे CEO वारेन बफेट आपल्या याहू ला दिलेल्या एक मुलाखतीत म्हणतात कि माझ्या कंपनीचे MD "थामस मर्फी" यांनी मला दिलेला एक सल्ला माझा निर्णय प्रक्रियेला बदलवणारा ठरला. मला थामस म्हणाला होता "वारेन एखाद्या व्यक्तीला तू मुर्ख आहेस असे म्हणणे हा तुझा अधिकार आहे आणि तू तो केव्हाही वापरू शकतोस, पण मला वाटते तो तू राखून ठेवायचा प्रयत्न कर, आणि तोंड अश्या वेळी बंद ठेवत जा आणि हे बघत जा की, आणखी काही दिवसानंतरही तुला त्या व्यक्तीबद्दल असेच म्हणावे वाटते का".

मनात आले म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल मी एखादी कॉमेंट करून टाकतो किंवा रागाने व्यक्त ही होतो, जसे काही आपले संबंध हे फक्त त्या व्यक्ती बरोबरच संपुष्टात येणार आहे आणि बाकीच्यासोबत माझे सर्व सुरळीतच चालणार, त्यावर याचा काही प्रभाव पडणार नाही, असा काहीसा भाव असतो. आपल्या व्यक्तिमत्व विकासात आणि नातेसंबंधाच्या विकासात नेमकी याची जागा सकारात्मक कि नकारात्मक ? व्यवसाय करत असताना आणि नोकरीच्या ठिकाणी टीम हाताळत असतांना कुठल्या प्रकारच्या अडचणी उभ्या राहणार आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त करण्याआधी त्याच्या विषयी आपले विशिष्ट धोरण झाले आहे म्हणून आपण त्याला असे बोलतो आहोत काय? आणि तसे असेल तर असे धोरण आपण का स्वाकारले आहे याची जाण आपल्याला आहे का ? त्याचा परिणाम काय होणार याचा अंदाज आहे का ? बहुतांश वेळी तो नसतोच.हे सर्व कसे समजून घ्यावे यासाठी विविध ट्रेनिंग आणि खूप उपयुक्त अशी पुस्तके आज बाजारात आहे, मुद्दा आहे जे योग्य आहे तिथपर्यंत आपण पोहोचणार कसे. महाविद्यालयात असताना बरीस्च अशी पुस्तके वाचल्या गेली की जी वाचल्यावर कळायचे की या पेक्षा दुसरे वाचले असते तर फायदा झाला असता, पण आर्थात वेळ निघून गेलेला आसायाचा. त्यामुळेच, गडबडीत काहीतरी वाचून वेगळ करण्यापेक्षा सर्वेक्षण करून आणि विशिष्ठ मार्गदर्शन घ्येउन वाचलेलं हे नेहमी मजबूत ढाचा उभे करण्यासाठी योग्य. पुस्तकासोबतच काही चांगल्या वेबसाईट ही यात तुम्हाला मदत करू शकतील.

एखाद्या व्यक्तीला प्रतिसाद देताना आपण त्याच्या सर्व बाजू किती विचाराधीन घ्येतो,आपले प्रतिसाद हे समग्र बाबींचा विचार करून झालेले असतात का?. अन्यथा कमकुवत नातेसंबंधाची पायाभरणी आपण करत आहोत याची जाणीव ठेवा. बऱ्याच वेळेला आपली धडक अश्या हिमनगालाही दिल्या गेलेली असते ज्याचा अंदाज लावताना फक्त २०%भागच आपण लक्षात घ्येतलेला असतो, अश्या वेळी तुमच्या भविष्याची टायटनीक होण्याची शक्यता जास्त… ! "मी अमुकला आज हे बोलून टाकले", "आज मी त्याला त्याची खरी जागा दाखून दिली" यासंबंधीची वाक्ये मी नेहमी ऐकतो. या वाक्यामध्ये प्रश्न सोडवण्या ऐवजी ते निर्माण करण्यावर जास्त भर असतो. Serco मध्ये असताना माझे सहकारी मला नेहमी, "सचिन तुझी चर्चा करण्याची आणि नातेसंबंध जपण्याची शैली म्हणजे Go with the flow ", तुला चुकीला चूक आहे असे स्पष्टपणे सांगता येत नाही का, मी म्हणायचो, मी चूक म्हणेलही, पण आज चूक म्हणालो आणि त्याने उद्या ते तसेच योग्य करून दाखवले म्हणजे… !

सांगायचा मुद्दा हाच कि आपल्या घरात टीवीच्या जागेपेक्षा पुस्तकाची जागा जास्त असू द्या… !

सचिन दाभाडे… !

Interview with Yahoo, Berkshire Hathaway chairman and CEO Warren Buffett said the best advice he ever received was from Berkshire Hathaway board-of-directors member Thomas Murphy. He told Buffett: "Never forget Warren, you can tell a guy to that you are fool and that is freedom of expression you can use anytime but you don't give up the right. So just keep your mouth shut today, and see if you feel the same way tomorrow."

Sometimes we comment on any person or even carry anger in expression just because it came in mind beause of Uncertain emotion and we carry feel as if relation will only be impacted with that particular guy and rest all thing will be as it is.The question is, how it take place in our personality development and relation building, whether it is positive or negative. We even can't imagine which type of problem will arise while managing team at work place and in businesses. Am i talking to a particular person due to certain approach is developed for the person? And; if is true then do we have idea, why did we accept such approach? Do we have any idea what would be the consequences? Often we don’t. We have various training and literature available in the market to understand all these complexities, moreover point is how we would reach there. So many such books had been read by us while completing graduation, and after reading it gave us sense that it could have been better to spend time on reading other book rather than completed one. But time already used to pass away. That’s the reason why it is always better to read after good observation and specific guidance rather than reading hastily for the heck of reading only, which will certainly help you build strong foundation. Some good website will help you along with books.

When we response people, do we take all other side in to our consideration? Is our responses based on understanding in totality of the thing? Otherwise keep in mind that we are developing weak relationship which will be ruined in very near future. Many of the time you tend to become titanic due to hit the iceberg by having only 20% of its above portion in mind. "today i scold somebody harshly", " I have shown him his right place today" such type of sentences i often hear. These sentences create a question rather solving it. When i was in Serco, my collogue use to say me "sachin your style of discussion and building relation is like Go with the Flow", can't you call incorrect for wronged one then and there. I use to say "I may say incorrect if things are wrong but, what if a person made it correct tomorrow".

The point is your size of library should be bigger than your TV.

Sachin Dabhade...
रविवारची सकाळ …. मस्त … फ्रेश अनुभव असतो ,काहीतरी झणझणित, तडका मारलेले लिहिण्यासाठी मला नेहमीच प्रेरणा मिळत राहते पण … मन मात्र पुन्हा पुन्हा काही तरी मुलभूत लिह्ण्याकडेच धाव घ्येते … तुम्हाला नेहमिसाठीच आराम मिळवा व् आयुष्यभरासाठी स्थिर व्ह्यवे हा विचार मनात येणे, ह्या किती मुलभूत मानवीय गरजा. पण पुन्हा पुन्हा प्रत्येक वळणावर आपण थांबत योग्य दिशेने चाललोय का? आपल्या क्षमता या मार्गाने वापरल्या जाणार आहेत का? हे प्रश्न तुमच्या स्थिर होण्याच्या मानसिक गरजेला व कृतीला पुन्हा पुन्हा आव्हान देत असतात. म्हणजे बघा ना एखाद्या इच्छित स्थळी जाण्यासाठी एखादा हाईवे तयार असने किंवा तयार करने हे निश्चितच आनंदाचे कारण; पण कित्येक आनंदाच्या आडवाटा आपल्या आयुष्यात कधीच येणार नाहीत याचीही तजवीज आपण करून ठेवतोच, नाही का? खरंच भारतीय लोकांसाठी सिनेमा हे नेहमीच विचार करायला लावणारे मध्यम, मलाही खूप धवळून निघाल्यासरख होत काही चांगले पाहिल्यावर, अर्थात: मी हे ठरवतो, काय पाहायचे आणि काय नाही, इम्प्तीयाझ अली हा असाच एक अवलिया जो मला नेहमी भावतो त्याच्या कलाकृतितुन. त्याच्या सिनेमानंतर बाहेर उठून आल्यावर तुम्हाला नेहमी काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत राहते. लातूरला असेच एकदा ट्रेनिंग साठी गेल्यावर त्याचा "तमाशा" पहिला, आणि अस्वस्थ करून गेला …

मला वाटते प्रत्येक वळणावर आपल्या क्षमतेला कुणी दुसर्याने प्रश्न केल्याऐवजी आपण स्वतःच का करू नये,म्हणजे कामातून पैसा आणि पैश्यातून पुन्हा काम, अशी योजनाच तुम्हाला तुम्ही आता करत असलेल्या कामाच्या भविष्यातील abjective पर्यंत घ्येउन जाईल. नाहीतर या उदाहरणातील व्यापार्यासारखे होईल. एक यशस्वी व्यापारी त्याचा उद्योग विकून टाकतो आणि आलेल्या पैशातून कित्येक पिढ्या आरामात बसून खातील म्हणून आलेला पैसा फार्म हाउस बांधने, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे आणि आयुष्यभर पैश्यातून व्याज मिळत राहील याची व्यवस्था करून स्वस्थ बसतो. पण अचानक एक दिवस तो त्याच्या संपत्तीचे नियोजन करणाऱ्या व्यवस्थापकाकडे जातो आणि पुन्हा एक व्यवसाय विकत घ्येण्याची गरज बोलून दाखवतो. व्यवस्थापक आश्चर्याने चकित होतो, कि इतक्या लवकर हे वळण का घ्येतले गेले, कारण एवढा भरमसाठ पैसा असताना एक नवीन व्यवसाय विकत घ्येण्याची गरज का भासली असावी ! व्यापाऱ्याने उत्तर दिले कि "मला माझ्या मुलाचे लग्न करायचे आहे आणि कुठलाही शहाणा व्यक्ती त्याची मुलगी काहीहि काम करत नसलेल्या व्यक्तीला पण घरात फ़क्त पैसाच असलेल्या मुलास देण्यास तयार नाही ".

सचिन दाभाडे
Sunday morning ….! Awesome.. Always a fresh experience.. I often have been motivated to write something spice & lucrative but mind flown away to write something which is foundational. Having a thought to be settle down at one place for permanently is apparently fundamental expectation. However, are we judging whether we are going in right direction at every turn ? whether my competencies are being used in greater extent? And these questions constantly challenging your psychological need and action which wants you to be stable. Now, let see, having a well prepared highway or to create it, to reach at desirable place always would be the reason of pleasure. But in the course we also ensure so many mid ways and hidden path will never come to our life, aren’t we?

Truly movies are medium of provoking the thought of Indian crowed, even I also get responsive after watching something good. Indeed, it is I who decides what to see and what not. Imtiyaz Ali is one of them, who astonish me always. After watching his movie you always feel incompleteness. When I was in Latur for a training once, saw his movie “Tamasha” and somewhere it took me to deep unsoundness of my heart!

I think, why shouldn’t you ask question to yourself at every turn of your life & career, rather, it is to be by asked by somebody else. Earning money from your work and again creating new work from the money earned, would be the only strategy will take you to your future objective for which you are working currently, otherwise your condition will not be much different from the businessman stated in given Example. A very successful businessman sold off his business and made a lot of money. After all the wealth was put into a well-planned trust in the most tax-efficient manner, the farm house rebuilt, the local charity supported, and after some days the man finally went to a wealth manager. He wanted to buy a business. The wealth manager was surprised that the turnaround was so quick. Wealth manager was surprised when the businessman told him the real reason. He was unable to get his son a bride because no sensible parent was willing to have their daughter wed into a family where no one did any work but there was a lot of money. That is why the man now wanted to buy a business.

Sachin Dabhade...
आक्सिडेंटमध्ये पाय फ्रैक्चर झाल्यावर आपण पायावर बैंडेज बाधून आराम करतो, त्याला बरे होऊ देतो. झालेली जखम तुम्ही नाकारत नाही,किंवा मला लागलच नाही असा आविर्भावही नसतो. हीच प्रतिक्रिया मानसिक धक्या (mental damage) बाबत होते का? याबाबत मात्र आपण काहीच घडले नाही असे ढोंग करताना नेहमीच दिसतो. बाहेरून स्वतःला स्टेबल प्रोजेक्ट करतांना आतल्या अस्वस्थतेला धूमारे फूटत असतात. मानसिक गोष्टिना याच पद्धतीने हाताळायची सवय तुम्हाला जडली असेल, तर एखाद्या दिवशी अचानक येणाऱ्या मोठ्या भावनिक भूकंपाची तयारीही करुण ठेवायला हरकत नाही.

शारीरक डॅमेज झालेले असताना तुटलेले हाड़ फरपटत घ्येउन फिरताना आपण विचारहि करू शकत नाही, इथे शारीरला मात्र वेळ दिला जातो. हेच मानसिक धक्का मिळालेला असताना घडले आणि स्वताला बर(heal) होण्यास वेळ दिला, तर तुमच्या रिटायरमेंट चा कालावधि वाढवता येऊ शकेल. एक उदाहरण देण्यासारखे आहे.

"माइंड ट्री" चे फॉर्मर सीईओ आपल्या ब्लॉग वर आमिर खानच्या वर्किंग स्टाइल आणि दूरदृष्टीचे उदा देऊन म्हणतात. एका सुपरस्टारला वर्षातून कमीत कमी 3 ते 4 सिनेमे बनवणे गरजेचे आहे. त्यात एखादा हिट होणेही तितकेच आवश्यक, असे असताना एक वर्षात, एक वेळी, एकच सिनेमा, ही स्ट्रेटजी स्पर्धेतून बाद झाल्याचा मेसेज देण्यासारखिच, तरीही हा पट्ठा पॅरेलल नसलेल्या भूमिका करून यशाचे नवे मानके स्थापित करतो आणि पुन्हा स्वतःला वेळ देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रमाणिकपणे जातो, वेळ घ्येतो, वेळ देतो...आणि परत जेव्हा येतो ते नवे आणि सक्षम काही तरी घ्येउनच.

सचिन दाभाडे...
मुन्नाभाई मूवी मध्ये बापू मुन्नाला सर्किट ची माफ़ी मागायला सांगतात, तेंव्हा त्याला कळते की एखाद्याला मारण्यापेक्षा त्याची माफ़ी मागने किती अवघड ..! अतिशय भावनिक प्रसंगात मुन्ना माफ़ी मागताना सगळ्याच्याच् डोळ्यातुंन पाणी आणतो... सीन आठवतो? काय आहे एवढं अवघड माफ़ी मागण्यात, फ़क्त दोन शब्द तर म्हणायचेय 'माफ़ कर' पण तरीही आयुष्य निघुन जाते, जवळचे हातातून दूर जातात, तडजोड करायला ही आपण तयार होतो पण आपल्याला कुणाची तरी गरज आहे हे मान्य करायला मन काही धजत नाही, मग ज्ञान आणि माहिती आभावी नष्ट झालो तरी चलते.
मानसशास्त्रीय दृष्टया माफ़ी मागने म्हणजे आपण फक्त स्वतः चूक आहोत एवढेच मान्य करत नाही तर समोरच्याची आपल्या आयुष्यातील गरजही अधिरेखित करत असतो (i need you). हे कमकुवत पनाचे लक्षण का मानले जाते हे समजने अवघड आहे ..!. आपल्याला समोरच्याची गरज आहे हे आपण किती वेळा स्पष्टपणे बोलतो ?, व्यवहारिक जगतात मी बऱ्याचदा असे अनुभवले, लीडरशिप आपल्या सोबत किंवा खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांकडून मदत मागने कमी प्रतिचे समाजते.

म्हणून आज हा प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय I know everything या अविर्भावात नेतृत्वाने किंवा ध्येयवादी व्यक्तिने वावरणे कितपत योग्य ?

सचिन दाभाडे
A newspaper boy daily gives newspaper, a milkman regular provides milk to your family. Have you ever gone to the electrician to solve your problem regarding your electronic gadgets or device? When he tells us to change any part of our asset, we say 'Yes' without any hesitation and allows them to do what they want to do it with the asset. We can give ample of example where we follow the direction or instructions without consideration of what would have been the truth behind. You follow him as it is, not because something must be right or wrong but, you know the parameters of his trustworthiness.
When your customer or stakeholder are able to get the meaning out of what you speak and act, is called as authenticity. You actually get raised as true professional, when authenticity becomes the part of your preffession, bit it can be any preffession you are involved in.

Remember, authenticity dosnt mean anything to be correct or incorrect, it is just bring yourself into daily practice, as you are.

Sachin dabhade

एखादा पेपरवाला रोज न चुकता पेपर टाकतो, दूधवाला न चुकता दूध आणतो, तुम्ही कधी आपल्या माहित असलेल्या व्यक्तिकडे आपले एखादे इलेक्ट्रॉनिक चे गॅझेट सुधारायला घ्येउन गेले आहात काय ? त्याने जेव्हा यात एखादी गोष्ट बदलावि लागेल असे म्हंटल्यावर आपण त्याला कुठलाही विचार न करता होकार कळवतो, अशी अनेक छोटी मोठी उदाहरणे देता येतील जिथे आपण खरे काय आहे, याची शाहानिशा न करताच समोरचा म्हणेल तसे फॉलो करतो, याचे कारण तुम्हाला मिळणारी सेवा ही चांगली किवा वाईट म्हणून नाही तर तीची विश्वासहार्तेचि मोजमापे तुम्हाला माहित असते.
तुम्ही सर्विस प्रोवाइडर म्हणून केव्हा काय बोलता याचा अर्थ तुमचा कस्टमर लावू शकने म्हणजे ऑथेंटिसिटी.
ही विश्वासहर्ता (authenticity) तुमच्या प्रोफेशन चा अविभाज्य भाग बनल्यावर तुमचा खरा प्रोफेशनल म्हणून उदय होतो.

लक्षात ठेवा, विश्वासहार्ता म्हणजे; काय चूक किंवा काय बरोबर याचे गणित नाही, तर तुम्ही जे आहात जसे आहात तेच तुमच्या रोजच्या प्राक्टिस मध्ये येणे होय .

सचिन दाभाडे..

Tuesday, May 17, 2016


One of the experience working with pharma MNC..!

Spectracare division deals with all communicative disease in Pharma sector, I was meeting doctors to take feedback on company’s product in slum area of Nasik. I had respective division manager with me. The place of hospital was so congested like small kitchen, however hospital was overflowing with patients. A manager who had come with me told doctor; that, our training manger has come down here to meet you and asked fever to meet directly, doctor told very clearly to wait outside, though. Manager got upset & settled down with helplessness. It seemed that, his impression was quite broken down, meanwhile due to rain, atmosphere became humid and we both became wet completely.
Now; he had to use all professional communication methodology and marketing strategies in such situation, in which he had been trained in my training session and I supposed to see how effectively he uses all learnings or to observe what difficulty he faces while using sales technique. He became quite relaxed when doctor allowed us to enter in doctor’s chember and explained the reason making us wait for long time. He was showing me, how he is applying all communication tactics while talking to the doctor. And also was indicating me that, how it is easy to tell in training, but difficult to apply on field in actual.
There was a man who was with his child, who dressed very colorfully and had style of cap of Anil Kapoor’s movie “A 1942 love story”. He was insisting doctor to prescribe medicine which costs below 50 Rs and even doctor was prescribing the same. One women was arguing that she requires only half of the bottle syrups to her child and that is the sufficient enough only and not to give full bottle, that is how she was trying to manage medicine cost in her budget. However doctor was handling all such talks patiently and moreover customizing his। approach as per Patients need. He gave 5 tablet free to one very old poor women, who had come alone to his hospital.
I wondered to see doctor was digesting how scarcity challenging medical knowledge and even I was trying to understand doctors business and his leadership which he is displaying in his area. I was completely wet till the time manger completes all scientific information of the product and finally I come out from the chember by having professional expression on my face as always.

Pharma MNC मध्ये काम करताना आलेल्या अनुभवपैकी एक !

स्पेक्ट्रॉकेअर डिवीज़न ही सर्व communicative डिसीज़ ला डील करते, नासिक च्या स्लम मध्ये काही डॉक्टर्स ना भेटून कंपनी च्या प्रोडक्ट चा फीडबॅक घ्येत होतो. सोबत रेस्पेक्टिव डिवीज़न मेनेजर ही होते, डॉक्टरच्या दवाखान्याची जागा एका छोटयाश्या किचन एवढी होती, पन दवाखाना खचाखच भरलेला, माझ्या सोबत असलेल्या मॅनेजर ने डॉक्टरांना सांगितले, की औरंगाबाद वरुन ट्रेनिंग मॅनेजर आलेत. डॉक्टर ने स्पष्ट शब्दात वाट पाहायला सांगितले. मॅनेजर थोडा नर्वस होऊंन बसला. थोड़ इम्प्रेशन डाउन झाल होत,त्यात पाऊस पडून गेल्यामुळे हवेत कमालीचा दमटपना असल्याने घामाने दोघीहि ओलेचीम्ब. मी ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या मेथड (method) आता अश्या कंडीशनमध्ये त्याला वापरायच्या होत्या आणि तो, त्या किती प्रभावीपने वापरतोय हे मला बघायचे होते किंवा त्यात काय अडचणी येऊ शकतात याचे निरिक्षण करायचे होते. आत मध्ये गेल्या गेल्या डॉक्टर ने लगेच वेटिंग मध्ये ठेवल्याचे एक्सप्लेनेशन दिल्याने तो थोडा हलका झाल्या सारखा वाटला. डॉक्टरशि बोलत असताना अधून मधून माझ्याकडे कटाक्ष टाकत, तो कसा सगळ्या कम्युनिकेशन प्रोसेस फॉलो करतोय हे दाखवत होता, आणि सोबतच, बघितलत किती सोप असते ट्रेनिंग मध्ये शिकवणे आणि अवघड असते प्रत्यक्षात अप्लाय करने, असा छुपा भाव.

दवाखान्यात एक रंगीबेरंगि शर्ट घालून आणि अनिल कपुरच्या 1942 लव स्टोरी सारखी स्टाइल असलेली टोपी घालून एक व्यक्ति आपल्या मुलाला घ्येउन आलेला. तो डॉक्टरकडून 50 रु च्या आत येणारी औषध लिहायला सांगत होता आणि डॉक्टर ते लिहतोहि, सोबत एक बाई आपल्या मुलासाठी फ़क्त आर्धि बाटली औषधच हवय पूर्ण गरज नाही असे म्हणून डॉक्टर सोबत डोक लावत होती आणि मेडिसिन तिच्या कॉस्ट प्लानिंग मध्ये बसउ पाहत होती. डॉक्टर अतिशय संयमाने सांगत शक्य तेव्हड़े कस्टमाइज करत होता. एका म्हाताऱ्या बाईला त्याने आपल्याकडे असलेल्या 5 गोळ्या फुकटच दिल्या, ती एकटीच् दवाखान्यात आलेली दिसत होती. आभावाने वैद्यकीय ज्ञानाला क्षणा क्षणाला दिलेले आव्हान डॉक्टर संयमाने पचवताना मी पाहत होतो. मी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो की डॉक्टरच्या या बिसिनेस आणि तो या क्षेत्रात करात असलेल्या नेतृत्वचा अर्थ कसा काढावा. मॅनेजर ने आमच्या प्रोडक्ट ची साइंटिफिक माहिती देऊन संपेपर्यंत मी पूर्ण ओला झालेलो, चेहऱ्यावर व्यवहारिक भाव कायम ठेवत मी नेहमी प्रमाणे बाहेर पडलो..!

सचिन दाभाडे

चित्र काढ़ताना ते केव्हा पूर्ण होणार आणि शेवटचा ब्रश कुठल्या रंगाचा असणार हे फ़क्त ते काढणाऱ्या चित्रकारलाच माहिती असत. इमारत बांधत असताना तिचा कॉन्ट्रेक्टरच सांगू शकतो की इमारत नेमकी कोणत्या क्षणाला परिपूर्ण होणार. एखादी बेस्ट डिश बनवत असताना शेफच सांगू शकतो की तिच्यात शेवटचे इंग्रेडिएंट काय व कसे पडणार. म्हणायचे एवढेच की गोष्टी सुरु करण्यासाठी झटताना तिचा शेवट आपल्या डोक्यात असतो का ?.

आपल्या आयुष्यच्या स्वप्नाचे मनोरे उभे करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या घटनामध्ये आणि त्याच्या प्लानिंग मध्ये काय येऊ शकते हे फ़क्त आणि फक्त स्वतलाच माहिती असते, तसे असेल तरच सुरु झालेली गोष्ट इछीत मुक्कामापर्यंत पोहचू शकते, अन्यथा हिल स्टेशन वर तर जायचे आहे पन, रस्ता आणि स्टेशनच माहित नसने याचा शेवट 0 ला मोठ्या संख्येने गुणल्यासारखेच.! (back to square) आणि त्यात पुन्हा चालकावर भरोसा ठेवणे म्हणजे एडमिन ला सीईओ बनवन्यासारखे.अशी सहल आनंद तर देते पन मर्यादित, बऱ्याच वेळेस हा आनंद जबरदस्तीने शोधून शोधून काढावा लागतो.

सचिन दाभाडे

लहानपणी मला आई नेहमी उगाच फुगू नको म्हणायची, ती हे तेव्हाच म्हणायची जेंव्हा, मी एखादी महात्वाची गोष्ट करायला हातात घ्येतली किवा एखादी गोष्ट न पटल्यावर विरोध करताना. काय असेल याचा अर्थ, काय म्हणायचे असते आपल्या सहकाऱ्यांना आणि जवळच्याना. यामध्ये अर्थ दडलेला होता हे समजल्यावर अश्र्य्चाकीत झालो.

फुगणे (puffed up) हि प्रकिया तुमच्या आयुष्यात तेंव्हाच होते जेंव्हा तुम्ही घाबरलेले असाल आणि तुम्ही जे कधीच नसतात त्याचे ढोंग (pretend) करत असतात किंवा मग तुम्ही स्वताला larger extent मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करता तेंव्हा, प्राण्यामध्येही काही असे प्राणी असतात जे अशी वेळ आल्यावर फुगतात (puffed up) साप, बेंडूक, मासा, यासारखे प्राणी हे घाबरल्यावर आपला आकार बदलन्याचा प्रयत्न करतात, पण ती परिस्तिथी निघून गेल्यावर त्या आकाराचि गरज संपल्याने ते पुन्हा आपल्या मुळ रचनेत येतात. माणसे सुद्धा आपल्या आकारापेक्षा मोठे होऊन वागायला लागली कि त्यांच्या आयुष्यात अनावश्यक घटनांची नांदी सरू होते किवा ते अश्या गोष्टीची सुरुवात करतात ज्याचा शेवट लवकर होणार असतो. आणि मग त्यानंतर आलेला मुळ आकार निराशाजनक असतो.

त्यामुळे who am i ? हा प्रश्न रिलेशनशिप मॅनेजमेंट करताना महत्वाचा ठरतो .

हा प्रश्न नेहमी विचारा ..!

सचिन दाभाडे

मला कुठल्या व्यक्तिने किती वेळ द्यावा हे सर्वस्वी समोरच्या व्यक्तिवर अवलंबून असूनही बरेच लोक त्याबद्दल त्रागा करून घ्येतना मी नेहमी पाहतो, त्यापैकी काही महत्वा चे वाक्ये अशी "मला काही महत्वच नाही", "माझ्यासाठी वेळच कुणी काढत नाही", "मला नहीं वाटत मी तेवढा महत्वपूर्ण आहे", किंवा या संबधित आणखी काही परिप्रेक्ष्य (approach).

जूलिएट सीझर मध्ये शेक्षपिअर एक घटना मांडतो; सीझर हा त्या काळातील माहित असलेल्या सर्वात भव्य साम्राज्याचा अविवादित अधिपति, कुठलीही गोष्ट तोंडात येन्या अगोदर पायावर पडलेली, प्रत्येक पुरुषाला आपण त्याच्यासारखच व्हाव; असा ! आणि प्रत्येक स्त्रिला आयुष्यात हवा असणारा सक्षम जोड़ीदार असा तो महान सम्राट, मग जूलियट, जी त्याला अनेक चाहणाऱ्यापैकी एक, या सर्वात आपले स्थान कुठे शोधत असणार?. तिने एक ठरवले की सिझर जेव्हां तिच्यासोबत वेळ घालवेल त्यात ती प्रचंड आनंदी राहील, हसेल, विनोद करेल, हे तिचे वागणे प्रचंड दबाव आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरणाऱ्या महान सम्राटाला त्याच्याकडे काहीतरी नसल्याची जाणीव करुण देत राहील, कारण ती त्याला असे काही देणार होती, जे एका सुपिक आणि दूरदृष्टि असलेल्या मेंदुतुनच येऊ शकते.
तिच्या या अश्या वागण्यामुळे सिझरला, आनंद आणि सुखात फ़क्त जूलिएटचिच आठवण यायला लागली आणि तिच्याकडे जाण्यासाठी त्याच मन धाव घ्येउ लागले, मग ते अगदी कुठल्याही परस्थितित!.
लक्षात घ्या.आपल्या प्रत्येकात एक अविस्वासनीय चुंबक (magnet) आहे आणि जे जे तुमच्याकडे नाहिये आणि तुम्हाला हवय ते मिळवण्यासाठी फ़क्त सहजतेने वागा, प्रमाणिक प्रयत्न ठेवा, तूम्हाला काहीही आपल्याकडे ओढण्याचि गरज नाही, फक्त आपली कृति सामान्य, सरळ ठेवा, बस्स ! लोक तुम्हाला शोधत येतील।

तुमच्या हातात असलेल्या वेळात तुम्हाला काय करायचे आहे आणि किती मापात (extent) मधे करायचे आहे हे तुमचे भविष्यावरील प्रभुत्व सिद्ध करेल.

सचिन दाभाडे

एखादी मधमाशी फुलावर बसुन मध गोळा करते तेव्हा ती फ़क्त मधच गोळा करत नाही तर, ती त्या सोबत तिचे आयुष्य ही त्या काळात जगत असते, या दोन्ही गोष्टीना एकमेकापासून वेगवेगळे करता येणे श्यक्य नाही. प्रोफेशनल म्हणून वावरताना कुठलीही व्यक्ति workplace मध्ये फ़क्त productivity च देत नाहीं तर तिचे आयुष्य ही जगत असते. राग, भीति, अस्वस्थता, प्रेम हे कुणीही घरी ठेवून येत नाही आणि येता ही येणार नाही. मुद्दा ऊरतो तो या सगळ्याच्या नियोजनाचा.

भावनिक नियोजन हा त्यामुळेच industry मघ्ये परवलीचा शब्द बनतोय.

आपले करियर चा वटव्रक्ष करू इच्छीणाऱ्यानी हे भांडवल स्वतःजवळ आहे याची सतत खात्री करुण घ्येत् रहा.
तो यशाचा राजमार्ग आहे।

सचिन दाभाडे.