Monday, November 7, 2016

माकडे आणि आनंद



माकडे आणि आनंद

काल एका माकडाची गोष्ट वाचनात आली, एका अरुंद तोंड असलेल्या घागरीमधून माकड काही पदार्थ काढायला लागते, पण घागरीचे तोंड अरुंद असल्याने त्याचे हात आणि दोन्ही वस्तू एकाच वेळेला बाहेर येणे अशक्य होऊन बसते. अर्थात माकडाला हे लक्षात न आल्याने माकडाने हातातील वस्तू सोडत नाही आणि ते तिथेच अडकून राहते. काही वेळाने डोंबारी येऊन त्याला पकडतो. अर्थात हा डोंबाऱ्याचा सापळा माकडाच्या लक्षात न येण्यापाठीमागे 'फक्त हाताला लागलेले काहीही करून पाहिजेच आणि हाताला लागले ते आपलेच'. अशी अपेक्षा, जी त्याला आहे त्या परिस्थितीत सुरक्षा ही देत नाही, व हाताला लागलेले आपले तेवढे काढून बाहेर पडणे ही जमू देत नाही. आशा परिस्थितीत माणसे माकड बनण्याची प्रक्रिया फार वेगात होत राहते.

एखाद्या घटनेतून आनंद किती घ्यावा व किती सोडावे हे कळणे खूप गरजे आहे, ते न समजल्याने आपले अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. असे हे माकड बनण्यापासून वाचण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा "महत्तम सामायिक आनंद" आपल्याला कळणे म्हणूनच खूप गरजेचे आहे. आनंदाच्या कल्पना आणि आपल्यासोबत घडणाऱ्या घटना यांच्यात खूप फरक झाल्याने नेहमीच निराशावादी राहणे हे बऱ्याच व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनून जाते. बरं आनंद आयुष्यात आणायचा तरी, तो कुठल्यातरी विशिष्ट अशा धोरणातूनच येईल अशी अपेक्षा निश्चितपणे चुकीचा प्लॅटफॉर्म तयार करते. उदा. "मी तेंव्हा आनंदी होईन जेंव्हा ...!" अशा अटींवर आनंद अवलंबून ठेवल्या जातो आणि मग तो जेंव्हा आलाय असे ठामपणे वाटते, तेंव्हा कोणीच कुठलीही तडजोड करायला तयार नसतो. आता हाताला लागलेले सर्व आपलेच आहे आणि यातील काही सोडणे म्हणजे आपण आपल्या आनंदासाठी सुरवातीला ठेवलेली अट मोडणे असे वाटल्याने त्यावर आपलाच अधिकार आहे असे ठामपणे अहममिका तयार होते आणि यामुळे, एखादा दुसराही याच घटनेतून तेवढाच आनंद घेणार असतो जेवढा तुम्ही, ही गंमत आपण सहजपणे विसरतो, असे केल्याने येणाऱ्या सर्व विसंवादामधून बाहेर पडण्याच्या शक्यता धूसर होत जातात.

घटनेतून येणारा आनंद ओरबाडण्याच्या नादात आपण हे विसरतो की या मडक्याचे तोंड अरुंद आहे याच्या बाहेर येण्यासाठी तेवढेच हातात ठेवावे लागेल ज्याद्वारे या नातेरूपी माडक्याच्या तोंडातून कुठल्याही प्रतिरोधाशिवाय बाहेर पडता येईल, अन्यथा पूर्ण एकटाच बाहेर काढण्याच्या नादात एकतर हात आतमध्ये अडकून पडेल, नाहीतर मडक्याचे तोंड फोडावे लागेल, अन्यथा कुणीतरी डोंबारी येऊन पकडेल आणि मग आयुष्यभर त्याच्या तालावर नाचावे लागेल. काही लोक हे समंजसपणे ओळखून, प्रत्येक घटनेतून आपला असलेला आनंद तेवढा काढून, दुसऱ्याचा आनंदी राहण्याचा अधिकार आणि त्याच्या अस्तित्वाची स्वीकृती मडक्यात ठेऊन बाहेर पडतात व पुढील आनंदासाठी सज्ज होतात.

आनंद हा तुमच्या आयुष्यात या प्रकारे येणार नाही ज्याप्रकारे एखादी बस बसस्टॉपवर येते, तर तुम्ही ठरवले तिथे तो सुरु होईल, त्यासाठी कुठल्याही अटी ठेवू नका आनंदाची वाट बघत बसू नका,कारण वाट बघत असताना भूतकाळातील नकार आणि भविष्यातील अनिश्चितता तुम्हाला अस्वस्थ करेल
"एका कुठल्या गुरु ने आपल्या शिष्याला सांगितले कि तुला तुला आनंद मिळवण्याचे सिक्रेट सांगतो ते म्हणजे

"आनंदी रहा "
कारण आनंदी राहणे ही घटना नाही तर सवय आहे.


सचिन दाभाडे
Management & Corporate trainer
Director – ASK Training Solution
Phone:- 8390130362
Mail:-ask@sachindabhade.com












क्रियावादी व्हा ...!


आपल्याला अस्वस्थ होण्यापाठीमागे आणि दुखावण्यामध्ये आमुक व्यक्तीचा प्रभाव आहे किंवा कुणाचा हात आहे, असे म्हंटल्यावर डोक्यात येणारी पहिली गोष्ट म्हणजे "एक व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली किंवा मग तमुक एखादी व्यक्ती माझ्यासोबत तशी वागल्यामुळे मी दुखावलो". कुणाच्याही कृतिमुळे आपण दुखावल्या जात नसतो तर समोरच्यांच्या भूमिकेला आणि क्रियेला आपण दिलेला प्रतिसाद व निवडलेली "प्रतिक्रिया" च भावनिक आणि मानसिकरित्या आपल्याला जास्त अडचणीत आणत असते. एलिनार रुझ्झवेल्ट ने म्हंटल्याप्रमाणे "तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुम्हाला दुखावू शकत नाही" हे यातील वास्तव आहे.
या प्रतिक्रियावादाच्या बाहेर या..! यात आपण वर्षानुवर्षे अडकून पडलोय, आपल्या प्रतिक्रिया आपण स्वतः निवडा, ती स्थलकालाच्या बंधनात येणार नाही याची काळजी घ्या ...! कुणी एक व्यक्ती, संस्था,घटना ही तुमच्या विचार प्रक्रियेच्या मुळाशी येऊ न देता सकारात्मक विचारधाराच जेवढ्या येतील ते पहा आणि आपल्या इच्छा त्याचा बळी न ठरू देण्यासाठी प्रयत्नशीलशील रहा. प्रतिक्रियेऐवजी क्रियावादी व्हा.
स्वतःचे नियम आखा, ते वैश्विक ऊर्जेच्या आणि प्रेरणेच्या तत्वाशी मिळते जुळते आहे याचा सतत मागोवा घेत रहा. नियमांच्या, मानसिक बंधनाच्या आणि भावनिक अवलंबनाच्या चौकटी तोडा, कुणी बोलले म्हणून बोलू नका, कुणी केले म्हणून करू नका, कुणी रागावले म्हणून रागावू नका, कुणी हसले म्हणून फसू नका, आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही म्हणून रुसू नका, जे काय करायचे ते करा, पण ते फक्त स्वतःच्या क्रियेतून करा प्रतिक्रियेतून नाही. डोक्यातील विचार फार काळ डोक्यात राहत नाही म्हणून त्याला कृतिकार्यक्रमाची जोड द्या, सोबत कुणी आहे ही अपेक्षा ठेऊन कृतिकार्यक्रम परावलंबी बनवू नका. त्याला मूलभूत विचारांची बैठक द्या. उद्या नावाची संकल्पना आळशी लोकांच्या डोक्यातून आलेलं पीक आहे त्याला बाजारात केंव्हाच विकता येणार नाही हे पक्के लक्षात ठेवा.
एवढे सगळे माहित असूनही मनात भीती असतेच, पाय अडखळताच शेवटी, कुणाचेतरी चित्र डोळ्यासमोर येतेच शेवटी, प्रेरणेच्या ओढ्यावर बांध आपण घालतोच शेवटी, भीतीचा प्रभाव वाहण्याच्या स्वभावाला भारी पडतोच शेवटी.
एक कराच ! बाहेर या घराच्या, आकाशाकडे बघा...! ते अनंत आहे, वाऱ्याकडे बघा...! ते संथ आहे, जमिनीकडे बघा...! ती विशाल आहे, वेळेकडे बघा...! ती चल आहे, यातून काही समजते का तेही बघा. हे जर नाही बघता आले तर एक करा, तुमच्या समोर असलेल्या व्यक्तींकडे बघा, ज्या तुमच्या प्रभावापासून मुक्त आहे आणि आता स्वतःकडे बघा, किती भीती, किती गोंधळ, किती संकुचितता, आणि अस्वस्थता आणि अभूतपूर्व असा विरोधाभास तुमच्या अंतरंगात, चाक एकीकडे आणि वासे एकीकडे हे शक्य नाही, म्हणूनच स्वतःला एकाच प्रश्न विचारा...
हे आणखी किती दिवस ?
उत्तर सापडले तर ठीक, नाही तर मी आहेच .......

सचिन दाभाडे
ASK Training Solution


इछीत ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी जशी मनामध्ये प्रबळ इच्छाशक्तीच नाही तर, आपल्या भूमिकेला समजून प्रोत्साहन देणाऱ्या लोकांची गर्दी आपल्या आजूबाजूला असावी असे प्रत्येक यशस्वी व्यक्तीला, नेतृत्वाला, उद्योगधंद्यात मोठे होणाऱ्या किंवा कुठल्याही क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमठऊ पाहणाऱ्या व्यक्तीला वाटत असते. तसेच ती सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ही वाटत असते. असे असतांना खूप मोठे मोठे प्रयत्न संबंधित व्यक्तीकडून होतांना मी नेहमीच पाहतो, पण त्याचा इलाज मात्र होतांना दिसत नाही. गरज, (दुखणे) एकीकडे आणि मलम दुसरीकडेच लावतांना लोकांचा आटापीटा अखंड चालू असतो.
एकीकडे जेंव्हा लाखो, हजारोंचे मॉब कुणाच्या बोलण्याला फॉलो करत असतात, तर कुठे लोकांच्याच जोरावर मोठमोठया कंपन्या उभ्या राहतात, एवढेच नाही तर आपल्या शहरात, गावात, गल्लीत, घरात असेही व्यक्ती असतात, जे प्रत्येकाच्या प्रशंसेला, कौतुकाला पात्र असतात, त्यांच्या सोबत बोलण्यासाठी लोक त्यांच्या आजूबाजूला नेहमीच घुटमळत असतात. असं नेमकं काय करतात ही लोकं, की जेणेकरून; सामान्य माणसाला जे स्वप्नवत वाटते, पण हे लोक मात्र लीलया करून टाकतात आणि ते ही कुठला गाजावाजा न करता. हेच करायला आपण गेलो की नाकी नऊ, तोंडावर पडणे, इच्छित प्रतिसाद न मिळणे, असे का होते ?.
नातेसंबंध विकसित करणे ही खरंच एवढी अवघड बाब आहे का ? तर नक्कीच नाही... पण बऱ्याच साध्या साध्या गोष्टी समजून न घेतल्याने रिलेशनशिप विकसित करणे अवघड होऊन बसते.सामान्य अशा बाबी न समजून घेता आपण आपली ऊर्जा, पैसा, वेळ, नको त्या ठिकाणी पणाला लावतो. जेंव्हा निकाल काही वेगळाच येतो तेंव्हा आपण पुन्हा अनावश्यक स्पर्धेसाठी कंबर कसायला लागतो, जी भविष्यात तुमचा आनंद, वेळ, आणि समाधान काढून घेणार असते. हा बूमरँग कसा टाळता येईल...!
या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरांची सुरवात माझ्या "Empowering Future" या फ्री सेमिनारच्या आजच्या दुसऱ्या सेशन पासून केली.
ASK Training Solution च्या ऑफिसामध्ये झालेला हा सेमिनार या सर्व प्रश्नाच्या उत्तराची कोंडी फोडणारा होता.
सहभागी झालेल्यांचे मनापासून आभार आणि पुढील Saturday साठी सर्वांना निमंत्रण. 



Regards,
Sachin Dabhade
Management & Corporate trainer
Director – ASK Training Solution
Phone:- 8390130362
Mail:-ask@sachindabhade.com


संगणकासमोर बसलेल्या व्यक्तीला हा पूर्ण विश्वास असतो की आपल्या डोक्यात असलेल्या कुठल्याही विचाराला तो वास्तवात आणु शकतो. हे वास्तव म्हणजे दूसरे तीसरे काही नसून, ते सर्व विचार तो कागदावर उतरवु शकतो, एवढेच. परंतु विचारांना वास्तवात आणण्यासाठी विचारपूर्वक केलेल्या सातत्यपूर्ण अशा मेहनतीची जोड आवश्यकच असते. 'एका जागी बसून आनंदाची केलेली फ़क्त कल्पना आणि तो मिळविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे'. 'मी केंव्हातरी पर्यटनाला जाणार आणि खुप मजा करणार' किंवा 'त्यासाठीची प्लानिंग सुरु करणे', 'माझे अपूर्ण शिक्षण मी कधीतरी पूर्ण करणार' किंवा 'त्यासाठी मी कुठे प्रवेश घेऊ शकतो याची तयारी प्रत्यक्षात सुरु करणे'.
वरील वाक्यांचे दोन्ही भाग दिसायला जरी सारखे दिसत असले तरी ते सारखे नाहीत, जो पर्यंत दुसऱ्या भागाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत वास्तवात काहीच बदलत नाही. हे जग टाइपराइटर नहीं, इथे तुम्हाला जर निकाल हवा असेल तर डोक्यात असलेल्या कथा फ़क्त कागदावर टाइप करुन भागणाऱ नाही तर वास्तवात उतरावण्यासाठी पावले उचलावे लागतील, अन्यथा पेपरवर टाइप केलेल्या मजकुराने न जग बदलते, न आपण.



Regards,
Sachin Dabhade
Management & Corporate trainer
Director – ASK Training Solution
Phone:- 8390130362
Mail:-ask@sachindabhade.com

Thursday, September 22, 2016


मृत्यूच्या दाराशी जाऊन आलेल्या स्टीव्हजॉब्स ने प्रत्येक दिवस शेवटचा मानून जगायला सांगितले, त्याने स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसमोर सांगितलेला ध्येयवाद संघर्षातून, अडीअडचणींवर मात करत पुढे जाणाऱ्यांच्या अंगात प्रेरणा निर्माण करणारा होता. मृत्यूचा स्पर्श आणि त्यानंतर आलेली जाणीव ही पृथ्वीवरील आपल्या मर्यादित वास्तव्याची जाणीव करून देते, त्यामुळे एकही दिवस व्यर्थ जाता कामा नये हा संवाद जणू त्याने जगातल्या सर्व तरूणांशीच केला.
कठीण संघर्षातून IPS झालेले विश्वास नांगरे पाटलांचे "मन मे हे विश्वास " हे प्रेरणादायी पुस्तक प्रकशित झालाय. सहज चाळताना शेवटच्या पानावरील ओळीवर दृष्टी आणि मन दोन्ही स्थिरावले. "जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात तशी भूमिकाही.. ! बस ! मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची , पंखात बळ निर्माण करण्याची, लाथ मारिन तिथे पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते". त्यांचा हा प्रत्येक शब्द म्हणजे जणू काही कडाडणारी वीज...! अस्वस्थ करणारी, मनावर काटा आणणारी, डोळ्यामध्ये लाल रंगाचे धुमारे फुलवणारी. स्वतःसोबत संघर्ष करण्याचे आव्हान देणारी ऊर्जाच त्यांनी हे लिहून निर्माण केलीय.
स्टीव्ह जॉब्स ने सांगितल्याप्रमाणे ध्येयवादाने पछाडण्यासाठी मृत्यू दिसण्याची गरज आहे का ? किंवा मग आयुष्य संपणार आहे याची जाणीव ठेवूनच कामाला लागण्यासाठीची ऊर्जा गोळा करता येणार आहे का ? कधीतरी शांत बसून स्वतःला स्वतःमध्ये शोधणे, हे ही जमलेच पाहिजे. जैन, बुद्धिझम हे मृत्यूच्या भीतीने नाही तर भीती आणि आसक्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रकियेतून निर्माण झालेल्या जीवन धारा आहेत. अनंत काळापासून मनुष्याच्या अंतरंगातील प्रेरणास्रोत शोधण्याची मूलतत्त्वे शोधणारे ज्ञान आमच्या आजूबाजूला आहे, पण ते मिळण्यासाठी एकच अट... ! ती म्हणजे फक्त डोळे आतून उघडणे जमले पाहिजे. जसे अंडे हे आतून फोडल्या जाते तेंव्हा जीवन आकारास येते आणि बाहेरून फोडण्याचा प्रयत्न झाला तर आयुष्याचा शेवट ... !
त्यामुळे आयुष्यात काहीतरी करायचे ठरवले असेल तर तुम्ही याच प्रक्रियेत आहात हे समजून घ्या. प्रत्येक दिवस प्लॅन करा, दिवसाची ध्येय ठरवा, रात्री झोपण्यापूर्वी ठरवलेले किती साध्य झालेय याचे पुनरावलोकन करा, राहिलेल्या गोष्टी उद्यासाठीचे उर्वरित (Pending) काम आहे हे लक्षात घेवूनच झोपा. सकाळी कामाची यादी वाढलेली असेल, पण ती पूर्ण करण्याची जिद्द आणि उर्जाही सोबत असेल याची खात्री बाळगा.
लक्षात ठेवा अपयश हि यशाची नुसती पायरीच नाही तर यशाचा मूलाधार आहे, अपयशाची वारंवारिता तुमच्यामधील सामर्थ्याला जगाच्या प्रत्ययाला आणते, अशुद्ध लोखंडामधील माती वितळून दूर करते, अपयशाच्या प्रचंड उष्णतेनंतरही जेव्हा काही शिल्लक राहते तेच यश आणि त्याशिवाय मिळालेले सर्व काही माती. म्हणून अपयश आल्यावर स्वतःसोबत बसा, अपयशासोबत बोला, तेच तुम्हाला पुढची दिशा दाखवेल. अगदी बिनचूक ...!

एवढं सगळं होऊनही नाही जमलं तर .... मला कॉल करा

सचिन दाभाडे
8390130362
ASK Training Solution

Thursday, September 1, 2016




हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतांना ती आपल्या हातात पोहचेपर्यंत विभत्स होऊ नये याची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे समजायचे असल्यास, मधाच्या पोळ्यातून मध काढणाऱ्याला काळजीपूर्वक बघा...! त्याच्या आणि त्याला हव्या असलेल्या अमृततुल्य चवीच्या मधामध्ये, फक्त एका डंखामध्ये महाभयंकर वेदना देण्याची ताकत असणाऱ्या मधमाश्या असतात. त्यावेदनेचा विचारच आपल्याला मधाच्या चवीपासून खूप दूर घेऊन जाऊ शकतो. त्यांना बाजूला केल्याशिवाय मध मिळणे केवळ अशक्यच ! त्यांना दुखवून (hurt) मारून मध गोळा करायचा प्रयत्न केल्यास किंवा कुठल्याही आक्रमक मार्गाने असा प्रयत्न झाल्यास हव्या असलेल्या मधाची प्रत (Quality) खराब होण्याची शक्यताही पूर्ण. तेव्हा हे जिकरीचे काम ज्या लीलया पद्धतीने केले जाते ते पाहणे मजेशीर आहे.
माणसांना हे लागू करतांना, हवा असलेला निकाल मिळवायचा असेल तर समीक्षा, विरोध, तक्रार करणे घातक आणि विरोधाभासी आहे हे पक्के लक्षात घ्या .गुन्हा केलेला व्यक्ती आपला गुन्हा मान्य करून जे वाट्याला येईल ते स्वीकार करतांना कधी आपण पहिला आहे का ?... तो नेहमी स्वतःच्या कृत्याची कारणीमिमांसा देतांना दिसेल अथवा त्यामागचे त्याचे शास्त्र सांगेल, तेव्हा आपण केलेली समीक्षा ही त्याची अपरिहार्यता असते, निवड नाही. उदाहरण म्हणून बघितले तर; कुणाला बदलवण्यासाठी आपण केलेले विधान हे "समीक्षा, विरोध, तक्रार" या चौकटीत येत असेल तर व्यक्तीमध्ये बदल होणे श्यक्य तर नाहीच पण याचा दुसरा नकारात्मक परिणाम होणार तो म्हणजे व्यक्तींशी असलेला भावनात्मक संपर्क धोक्यात येईल, ही "कार्नेजी" यांची मांडणी, नेटवर्किंग आणि रिलेशनशिप डेव्हलोपमेंट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मोलाची आहे.
त्यामुळे बदल घडवण्यासाठी एखाद्याच्या नकारात्मक बाबीवर बोलून त्या नियंत्रित करण्यापेक्षा चांगल्या बाबींना सतत दिलेली मान्यता आणि प्रोत्साहन जास्त उपयुक्त आहे, "स्कीनर' या विख्यात मानसशास्त्रज्ञाने आपल्या जनावरांवर केलेल्या संशोधनात हे सिद्ध केलेय की आपल्या चुकीच्या वागण्याबद्दल शिक्षा मिळालेल्या जनावरांपेक्षा, चांगल्या वागण्यासाठी प्रशंसा मिळालेल्या जनावरांमध्ये शिकण्याचा वेग हा जलद आणि लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते. आणि हे मनुष्यावरही लागू होते हे नंतर झालेल्या संशोधनातून सिद्ध झालाय....


सचिन दाभाडे
ASK Training Solution

Saturday, July 2, 2016



Sometimes we find very difficult to take decision and come to the conclusion for what is to be our next action.

People go after so many things for right decision, like; some will take suggestion from nearer ones, some will follow intellectuals or some will follow routine way. However this may or may not be resulted in satisfaction.

Would like to give one very nice method to find out the way from dilemma. Few days back, I saw one short serial and I astound to get such simplest method to get the rid of confusion.

What you need to do is to have a coin and decide which side indicates which of your mind set. Go to silent place and toss a coin. Remember you need not to keep any side of the coin in your mind before toss as we do in regular toss. When you will toss; close your eyes and think, which side you are expecting. Once coin stable on your hand don’t even look at it…! Because you already got a resolution….!

When coin was in the air, the side you were expecting is the only your ultimate way. Just go with it. Follow your heart because great victories will come that way only.

Have a great Sunday



Sachin Dabhade

Friday, July 1, 2016



Do you answer the intention or question?

I remember, in my childhood when people used to ask me, what do you want to become? My answer, “don’t know”, People ask, “why”, I say, “that also I don’t know”.

After this a very simple, basic question and answer round, 2nd round usually used to get started, and then I become suspicious about question which was being asked by the people on my progression. I was completely unable to understand that, why I am getting nervous when I was facing such question. Though it seemed very simple by its nature, but I was always suspicious about the intentions behind asking.       

In a very early age, child starts to answer to your intention and not to your question. Then every time when you emotionally deal with them they take only emotion and intention behind and not the structure you are building around it. This means, if your intention is to make them feed, they will resist if they don’t require it, though you are conveying it in different style. If this could be the case at childhood, defiantly adulthood requires more attention to use your language in a more neutral way. Through neutral way we can check the need of a person, and then we can go further. At very initial stage, if we start to push people with your intention, means the cooperation in communication will go for a toss for sure very soon.

For child stage, you can make it possible your intention to be correct by any which way as you need to discipline them, but in adults; if you are not sure whether you are starting with neutrally or with any intention, you can be found soon as like a Karna in Mahabharata, the character in Indian mythology whose wheel of chariots stuck in the middle of the war and become reason for his forced martyr.     

Neutral way of asking question and dealing with critical situation becomes important in communication and would like to through some light in my upcoming trainings, through “Clean language Methodology”




Sachin Dabhade

Me and my professional friends were quite influenced by thought, “Yesterday is history, tomorrow is mystery and today is a gift, that’s why we call it present”. Well said dialogue from the movie “Kung fu Panda”. We all used to find it resembles to our day to day life and that’s why, it was all time motivational line for all of us.

Apparently; most of the crucial reason of crisis in our life is, most of us don’t live in present. This indicates our historical memory has impact on our decision capacity and ambiguity of future influence our current states of mind.

When we communicate to others we bring all stuff from history and suspect from future, and then promote our intentions on other person. But that doesn’t make communication effective.

Reason why I am planning to incorporate some insights of “Clean Language Methodology” in my all communication skill development seminar and workshop. “Clean Language” is a communications methodology, developed by David J Grove. Clean Language offers helpful techniques to all professional communicators, especially those working closely with others.

Clean Language techniques are aligned closely with modern 'enabling' principles of empathy, and understanding, as opposed to traditional 'manipulative' (conscious or unconscious) methods of influence and persuasion and the projection of self-interest.

Clean Language helps people to convey their own meaning, free of emotional or other distracting interpretation from others. As such Clean Language promotes better clarity of communications, neutrality and objectivity (absence of emotional 'spin', bias and prejudice), ease of understanding, and cooperative productive relationships.
I am quite hopeful that training on such kind’s of standard method makes overall process of working towards positive change effective.

Sachin Dabhade...


When we express ourselves and whatever we have in our mind comes out in any form becomes public property. still; if you believe it is yours and want possession over it, then don't worry ! your fear will come in reality anyways. Whatever you are doing publicly is a ultimate part of public entity. now a single announcement cant change your possession destiny.

Still we have chance to save your intellectual and other property which is being displayed socially, if you feel you have created and owned by you.

Have a happy life ahead.

Sachin Dabhade.

बॉक्सिगच्या पिंजऱ्यात घामाने पूर्णपणे ओलेचिम्ब झालेले असताना समोरचा बॉक्सर आपल्या आव्हानात्मक हावभावातून तुम्हाला सतत समज देत असतो की त्याला जिंकणे हे अशक्य, त्याचे मसल्स प्रयेक क्षणाला तुम्हाला वास्तवतेची जाण करून देत असतात, तुमच्या स्वप्नाच्या मर्यादा ठरवत असतात...!

खरच प्रश्न पडतो, कसा घडला असेल मोहम्मद अली? प्रतिस्पर्ध्याच्या एक एक हालचाली ओळखणारा, प्रतिस्पर्ध्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलाचे अंदाज लावणारा, त्यांच्या प्रत्येक ठोशाची क्षमता परखणारा, त्यांच्या ऊर्जेतील चढ उतार ओळखून आपल्या हल्ल्याची बांधणी करणारा अली आणि आणखी काय काय ...! कदाचित आपल्या आकलनापलीकडला, म्हणूनच जगज्जेता.....!

कमालीचा "focused approach" हाच तुम्हाला घडवेल, नाहीतर आपल्या उद्दिष्टा कड़े झालेले थोड़े दुर्लक्ष तुम्हाला वेळ आल्यावर रडवेल.

सचिन दाभाडे


 Did you set the Goal for your future?
• Do you feel still confused on relevance of goal setting?
• Do you want to understand physiological & behavioral background of goal?

Above questions are continuously hitting the mind of professionals, corporate, businessmen’s, trainers and employee Etc. Everyone try to search out meaning as per their own work context, however it has physiological & behavioral angel which is not touched upon by most of the organizations, firms and that constantly dragging us far behind from our objectives.

How goals can be understood physiologically & behaviorally along with well accepted goal setting approach, is the major need, I have seen, for achieving desired output. I have added “Goal Setting – A Profound Approach Towards Confirm Output” module in my training program with having vivid understanding of human dynamics.

“Goal setting” module will be delivered as seminar and 1 day workshop as per requirements.

Seminar Duration will be for 4 hrs

You can arrange “Goal setting” seminar for your business purpose or any other developmental purpose.

For more detail contact on:-

Sachin Dabhade
Management & Corporate trainer
Phone: - 8390130362
Sachin.14d@gmail.com

Friday, June 17, 2016


एक विचार करुन बघा, तुम्ही आता जे काम करत आहात किंवा ज्यामध्ये आपण स्वतःच्या क्षमता सिद्ध केल्या आहेत अशी सर्व कामे बंद पडली... एकदम डेड एन्ड..!

काय होईल..!

बघा विचार करून...!

मग आजुबाजुला छोट्या मोठ्या दुकानामधुन, रस्त्यावर काम करत असलेल्या लोकांकडे बघने सुरु होईल आणि मग लक्षात येईल की अरे आशी आणखी कोणती कामे आहेत जी मला जमु शकतात, आणि बऱ्यापैकी हाताला भिती लागेल. आपण ज्या कामात कुशल आहोत ते करत असताना इतर कामे शिकण्याची किती जण तयारी करतात. 'एकाग्रता' म्हणून बऱ्याच सहज सोप्या गोष्टी शिकण्याचे टाळणे, आणि याचे कारण काय तर अपयश, किंवा जे ठरवले आहे त्या पासून दूर जाण्याची भिती !

जॉन मेसन ने आपल्या पुस्तकात अमेरिकेचे राष्ट्रपति थिओडोर रूज़वेल्ट ने म्हंटलेले एक वाक्य सांगीतलेय, "Far better it is to dare mighty things to win glorious triumphs, even though checkered by failure than to rank with those poor spirits who neither enjoy much nor suffer much because they live in the great twilight that knows not victory or defeat"

मेसन पुढे म्हणतो की, one of the riskiest thing you can do in your life is to take too many precautions and never have any failures or mistakes.

सचिन दाभाडे....

Friday, June 3, 2016


पैश्याचे दोन उपयोग..! एक म्हणजे त्याच्यातुन स्वतःला हव्या असणाऱ्या गोष्टी विकत घेऊन समाधानी होणे. म्हणजे आपल्याकडे असलेल्या पैश्यातून हवी ती फळे, किंवा कपडे ई. घेणे आणि दूसरे म्हणजे पैश्यातून अशी वस्तु घेणे जी पुन्हा पैसा निर्माण करू शकेल उदा. एखादे घर घेणे, किंवा व्यवसायात गुंतवणे इ. म्हणजे बघा; काही लोकानां संत्री आवडतात म्हणून ते विकत घेऊन खातात तर काही लोक संत्र्याची झाडे लावतात, त्यातच त्यांचे समाधान. झाड़ लाउन ते आपला आनंद पुनरुत्पादित करतात व त्यासाठी आपल्याकडे असलेला वेळ आणि पैसाही काही प्रमाणात खर्च करतात. यात गुंतवलेल्या पैश्यातून समाधान मिळेलच याची शाश्वती नाही, परंतु येणाऱ्या पिढ्यासाठी ही सर्वांगाने सकारात्मक गुंतवणूक असते आणि हो तीही त्यांनीच करावी ज्यांना गमवायची भीति नाही, अन्यथा प्रत्येक पावलावर, हे करून काही चूक तर नाही केली ना...! हा विचार कुठेच् पोहचू देत नाही.
पहिला प्रकार हा आपल्या शारीरिक गरजेशी (consumptive need) असलेल्या समाधानाशी संबंधित आहे तर दूसरा प्रकार हा पैसा खर्च करुण पुनरुत्पादित (reproductive) करण्याशी संबंधित. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या जागेला आपण किती 'मोबादला' म्हणून परत करत असतो, याचा विचार एक व्यवहारिक व्यक्तिमत्व म्हणून प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. म्हणजे मला माझ्या व्यवसायाने काय दिले हे जितके महत्वाचे, त्या ही पेक्षा मी माझ्या व्यवसायला काय दिले हे आहे.
हे जाणून घेण्याचे काही मुलभुत मानक आहेत, जसे माझे काम श्रीमंत होणे, ते लोकांमध्ये मान्यता पावणे आणि हे तेव्हाच शक्य, जेव्हा कामाला 'मीळवण्यापेक्षा' जास्त 'दिले' जाईल. आपण आपल्या कामाला अथवा व्यवसायाला परत न देऊ शकण्याचे दोनच कारणे; एक तर तुम्ही चुकीच्या जागेवर आहात अथवा तुम्हाला तुमच्या कामाला परत देण्याची मानसिकता/इच्छा/क्षमता नाही.

सचिन दाभाडे.....

Monday, May 30, 2016




भुवन लाकडाची फळी घ्येउन गावात असलेल्या मोकळ्या जागेत येतो, सर्वांच्या प्रश्नार्थक नजरा भुवन वर खिळलेल्या, भुवन नेहमी प्रमाणे आपल्या सहज सोप्या लकबीत गावासमोर नवीन प्रात्यक्षिकांच्या तयारीसाठी सज्ज होताना आपल्या खुमखुमी असलेल्या भाषेत नविन येणाऱ्या आव्हानात संधी शोधन्याच्या त्याच्या पावित्र्यात बोलू लागतो. गोलू ला बॉल पकडायला सांगतो. किती सोप आहे हे सांगताना तो गोलुचि इच्छाशक्ति व् प्रेरणा वाढवत असतो. बॉल मारण्याच्या पावित्र्यात येऊन गोलुला बॉल टाकायला सांगतो, त्याच्याकडे पाहणाऱ्यांच्या नजरेत एकाच वेळेला निराशा, राग, अस्वस्थता....! या सगळ्याकडे थोडेसे दुर्लक्ष करत त्याचे लक्ष्य बॉलकड़े. गोलू वेगात बॉल भुवनच्या दिशेने भिरकावतो आणि त्याला उत्तर म्हणून आपल्या पूर्ण ताकदीनिशी भुवन फळी ने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण बॉल फळी ला न लागता निसटतो, भुवनच्या चेहऱ्यावर निराशेची थोडीशी लकेर, निसटलेला बॉल गौरीला आणायला सांगतो, तेवढ्यात गौरीच्या वडिलांकडून तिला भुवनला मदत करण्यास विरोध .

दुसऱ्या प्रयत्नसाठी पुन्हा भुवनची सज्जता .. एकुलता एक व्यक्ती गोलू ची साथ सुटू नये म्हणून गोलुला पुन्हा विश्वास देत बॉल फेकायला सांगतो, यावेळी पुन्हा बऱ्याच नजरेत थोड़ी फार आशा, काही साशंक, काही अस्वस्थ......आणि काही घाबरलेले ,सगळ्याच अर्धवट नजरा भुवनच्या पवित्र्याकडे...आणि भुवन पुन्हा प्रात्यक्षिकाच्या पावित्र्यात, पुन्हा बॉल भुवनच्या दिशेने आणि पूर्ण ताकद लावून यावेळेला पहिल्यांदा गेलेली इज्जत वाचवण्यासाठी भुवनचे फळी फिरवणे…. आणि पुन्हा गंभीर निराशा… ! हातातून फळी निसटून यावेळेला दूर जाऊंन पड़ते. आता मात्र बऱ्याच भूवया उंचावतत, अस्वाथता टोकाला, पराभव... पराभव... असेच काहीसे ….!

गोंधळलेला भुवन , बोललेला पूर्ण करू न शकलेला भुवन , अपयशी भुवन , अपरिपूर्ण भुवन , असक्षम भुवन, स्वताच्या स्वाभिमानासाठी सगळ्या गावकऱ्यांच्या आयुष्याला अडचणीत आणणारा भुवन; नजर चुकवत पुन्हा फळी कड़े जायला निघतो. आता हा घरी जाऊन फळी एका कोपऱ्यात ठेवून फुकाचे प्रात्याक्षिके नक्कीच करणार नाही असे एखाद्याच्या डोक्यात…। पुन्हा कॅमेरा भुवनकडे, फळी घामाने निसटल्याचे कारण देताना, अरे हा तर पुन्हा मैदानात, लोक आता हे अशक्य आहे अश्या भावत पुन्हा आपापल्या कामात लागताना, काहीजण आपण दुर्लक्ष करतोय याचे बेमालूम नाटक करताना, पण कान मात्र त्याच्या पुढच्या वाल्गनेकडे, त्याच्या शब्दाकडे, आणि अर्थात त्याच्या कृतीकडे.… !

तो पुन्हा फळी उचलताना काय म्हणतो हे ऐकण्यास, बघण्यास जणूकाही सर्वच इक्छुक. पुन्हा तो फळी उचलतो आता मात्र फळी हातातून सटकु नए म्हणून मातीत हात पूर्ण भरून घेतो, यावेळी बऱ्याच मुठी अवळलेल्या, नजरा ताणलेल्या, भुवया उंचावलेल्या, भुवनने उगारलेल्या फळी मध्ये भविष्य जणू. भुवन काय करतोय यांच्याशी आम्हाला कही घेणे नाही हा आविर्भाव सगळ्यांच्या नजरेतून गायबच, यावेळी. गोलू यावेळेला बॉल टाकताना जास्त सतर्क, आणि भुवनचि गर्जना "ईस बार मारेंगे और बहोत दूर तक मरेंगे ", सर्वांचे श्वास गळ्यात
आणि वेगाने येणाऱ्या बॉलला फळीने एक जबरदस्त स्ट्रोक......!


सचिन दाभाडे….


आपल्याला माहिती असलेले दुसर्यांना सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे माहिती देत असतांना "ही माहिती माझ्याकडे आहे बघा जर तुम्हाला तिचा उपयोग झाला तर" ही एक पध्दत आणि दुसरी म्हणजे "तुम्हाला ही गोष्ट माहित कशी नाही; आश्चर्य आहे, तुम्ही या मार्गाने जायला हवे ". पहिल्या पद्धतीत समोरच्या व्यक्तीच्या क्षमतेला आव्हान न करता आपल्याकडे जे काही आहे ते विवेकवादी पद्धतीने समोर ठेवलेले असते, त्यात समोरच्याच्या वाक्याशी आपण केलेल्या वाक्याची बरोबरी नसते आणि ते स्वीकारले गेलेच पाहिजे असा अट्टाहास नसतो. कारण समोरच्याच्या मेंदूने घटना आणि माहिती वेगळ्या प्रकारे आत्मसात केलेली असणार आणि तिचे प्रक्षेपण ही वेगळ्या प्रकारे होत असणार किंवा होऊ शकते हे अभिप्रेत असते. यातून होणारे मुद्द्याचे आदानप्रदान (content transaction) हे चर्चा च्या माध्यमातून सुरु होऊन संवादाच्या दिशेने प्रवास करत राहते आणि याद्वारेच व्यक्ती शिकण्याची प्रक्रियेत येतात ते शिकतात(learning), समोरच्याला काय म्हणायचे आहे हे समजूनही (understanding) घ्येतात. दुसऱ्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत कळत नकळत, अप्रत्यक्षरित्या, किंवा कधी कधी जाणूनबुजून समोरच्याच्या माहिती संकलित करण्याच्या किवा घटना समजून घ्येण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात येते, अश्या वेळी माहितीचे आदानप्रदान चर्चेत रुपांतरीत होत नाही त्यामुळे अर्थात ते संवादापासूनही कोसो दूर असते.

आता अश्या प्रक्रियेतून शिकण्याची गरज कुठल्याच स्थरावर निर्माण होणार नाही हे वेगळ सांगायची गरज नाही. आपण आपले मत मांडत असतांना (ज्याला आपण बऱ्याच वेळा चर्चा असे स्वतःच संबोधतो) आपल्या बोलण्याच्या पद्धतीत वरील दोनपैकी कुठले भाव असतात याचे परीक्षण करून बघा; पहिला की दुसरा ? आपण बोलत असलेल्या मुद्यातून समोरच्याने समजून घ्यावे की शिकून घ्यावे की मग फक्तच ऐकून घ्यावे हा आपला उद्देशच आपली पद्धत कुठली असली पाहिजे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करेल, जे शिक्षक मुलांना शिकवतात, जे प्राध्यापक मुलांशी ज्ञानाचा व्यवहार करतात, जे विद्वान चर्चेत आपले म्हणणे मांडत असतात या सर्वांचा हेतू जर बघितला तर साधारणपणे पहिल्या पद्धतीने आपले म्हणणे मांडणे अपेक्षित आहे, परंतु बऱ्याच वेळेला आपला विचार मांडताना किंवा एखाद्याला मार्गदर्शन करतांना जेव्हा व्यक्ती दुसरया पद्धतीने आपले म्हणणे मांडत असेल तेव्हा अस्वस्थता, तुलना,वाद, द्वेष, यांची बीजे पेरली जाणे अपरिहार्य, याउप्परही काही आक्रमक होऊन ज्ञान प्रसार करतांना दिसतात.एकाच वेळी मी लोकांना ज्ञान व माहिती पुरवतोय आणि दुसरीकडे आक्रमक होतोय हेच मुळात परस्पर विरोधी आहे. त्यामुळे लोकांना काही देण्याआगोदर आपला हेतू तपासा कारण तो काहीही असला तरी पद्धत चुकली कि तुम्ही नाकारले जाणार,आणि नाकारले च जाणार असाल तर पद्धत बदलायला काय हरकत आहे, लओत्से म्हणतो "दुसर्यांना ओळखणे हि विद्वत्ता आहे पण स्वताला ओळखणे हे ज्ञान". अर्थात मलाही हे जे वाटले ते ही पटलेच पाहिजे असे नाही, फक्त मला असे वाटते, एवढेच …!

सचिन दाभाडे …

Thursday, May 26, 2016


टाईम्स ऑफ इंडिया मध्ये आज एक न्यूझ वाचली ८ महिन्यापूर्वी सुरु झालेली pulse कॅन्डी, या महिन्यात १०० करोड चा टप्पा गाठून गेली. योग्य जागा बघून आणि गरज ओळखून आपल्या प्रोडक्टची योग्य प्लेसमेंट करून प्रेरणा देणारे अप्रतिम उदाहरण. कच्चा आम अशी branding करून हार्ड बॉईल्ड प्रकारात येणारी कॅन्डी ही उद्योगात नवीन येणाऱ्या सोबतच आईडिया (Concept) मध्ये स्वतःला नाविन्यपूर्ण ठेवणाऱ्या प्रत्येकाला आणि चिरेबंदी झालेल्या मार्केटला फोडून, कसे स्वतःचे स्थान एवढ्या कमी अवधीत निर्माण केल्या जाऊ शकते याचे हे जबरदस्त उदाहरण … ! एकूणच हार्ड बॉईल्ड प्रकारातील जवळपास २ हजार करोडच्या मार्केटला २५% ग्रोथमध्ये महत्वपूर्ण हातभार या प्रोडक्ट ने लावलाय, मला आनंद या गोष्टीचा आहे की जे लोक नाविन्याची आणि गरजेची चव ओळखतात, भारतीय लोक त्याची “चव” ठेवतात आणि हे नेहमीच सिद्ध होत आलंय.

रस्ते बंद झाल्यावर आपण काय करतो, प्रत्येक जन आपल्या क्षमतेनुसार परिस्थितीचा मुकाबला करतो काही थांबतात, बदलतात, समजुन घ्येतात, ओरडतात, घाबरतात, घबरवतात, पळतात आणि बरयाच इतर प्रतिक्रिया ...... आणि काही लोक नविन रस्ताच बांधायला घ्येतात. प्रसिद्ध लेखक, कवयत्री 'माया अन्जेलो' आपल्या आत्मचरित्रात ( The Best Advice I Ever Got) तीला तिच्या आजीकडून आयुष्यात मिळालेल्या महत्वपूर्ण सल्ल्याबद्दल सांगते, "जगाने तुला अशा मार्गावर जबरदस्ती ढकलले जे तुला करायला मुळीच आवडत नाही, जेव्हा तू समोर बघतेय आणि तुला सांगण्यात आलेले गंतव्य (destination) तुला बिलकुल अपेक्षित नाही, आणि जेव्हा तू मागे वळून पाहते तेंव्हा जिथून तू सोडून आली आहेस तिथे तुला मुळीच जायचे नाहीये, तेव्हा; रस्त्यावरून बाहेर पड आणि स्वतःचा मार्ग बांध".

ज्यांच्या मार्गात दगड आहेत त्यांनी ते बाजूला करायच्या फंदात पडत बसु नका; एवढंच लक्षात असु द्या ... नविन रस्ता तयार करायला पहिल्या थरावर हीच दगड कामाला येतील....!

सचिन दाभाडे ...

बर्कशायर हाथवे चे CEO वारेन बफेट आपल्या याहू ला दिलेल्या एक मुलाखतीत म्हणतात कि माझ्या कंपनीचे MD "थामस मर्फी" यांनी मला दिलेला एक सल्ला माझा निर्णय प्रक्रियेला बदलवणारा ठरला. मला थामस म्हणाला होता "वारेन एखाद्या व्यक्तीला तू मुर्ख आहेस असे म्हणणे हा तुझा अधिकार आहे आणि तू तो केव्हाही वापरू शकतोस, पण मला वाटते तो तू राखून ठेवायचा प्रयत्न कर, आणि तोंड अश्या वेळी बंद ठेवत जा आणि हे बघत जा की, आणखी काही दिवसानंतरही तुला त्या व्यक्तीबद्दल असेच म्हणावे वाटते का".

मनात आले म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल मी एखादी कॉमेंट करून टाकतो किंवा रागाने व्यक्त ही होतो, जसे काही आपले संबंध हे फक्त त्या व्यक्ती बरोबरच संपुष्टात येणार आहे आणि बाकीच्यासोबत माझे सर्व सुरळीतच चालणार, त्यावर याचा काही प्रभाव पडणार नाही, असा काहीसा भाव असतो. आपल्या व्यक्तिमत्व विकासात आणि नातेसंबंधाच्या विकासात नेमकी याची जागा सकारात्मक कि नकारात्मक ? व्यवसाय करत असताना आणि नोकरीच्या ठिकाणी टीम हाताळत असतांना कुठल्या प्रकारच्या अडचणी उभ्या राहणार आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त करण्याआधी त्याच्या विषयी आपले विशिष्ट धोरण झाले आहे म्हणून आपण त्याला असे बोलतो आहोत काय? आणि तसे असेल तर असे धोरण आपण का स्वाकारले आहे याची जाण आपल्याला आहे का ? त्याचा परिणाम काय होणार याचा अंदाज आहे का ? बहुतांश वेळी तो नसतोच.हे सर्व कसे समजून घ्यावे यासाठी विविध ट्रेनिंग आणि खूप उपयुक्त अशी पुस्तके आज बाजारात आहे, मुद्दा आहे जे योग्य आहे तिथपर्यंत आपण पोहोचणार कसे. महाविद्यालयात असताना बरीस्च अशी पुस्तके वाचल्या गेली की जी वाचल्यावर कळायचे की या पेक्षा दुसरे वाचले असते तर फायदा झाला असता, पण आर्थात वेळ निघून गेलेला आसायाचा. त्यामुळेच, गडबडीत काहीतरी वाचून वेगळ करण्यापेक्षा सर्वेक्षण करून आणि विशिष्ठ मार्गदर्शन घ्येउन वाचलेलं हे नेहमी मजबूत ढाचा उभे करण्यासाठी योग्य. पुस्तकासोबतच काही चांगल्या वेबसाईट ही यात तुम्हाला मदत करू शकतील.

एखाद्या व्यक्तीला प्रतिसाद देताना आपण त्याच्या सर्व बाजू किती विचाराधीन घ्येतो,आपले प्रतिसाद हे समग्र बाबींचा विचार करून झालेले असतात का?. अन्यथा कमकुवत नातेसंबंधाची पायाभरणी आपण करत आहोत याची जाणीव ठेवा. बऱ्याच वेळेला आपली धडक अश्या हिमनगालाही दिल्या गेलेली असते ज्याचा अंदाज लावताना फक्त २०%भागच आपण लक्षात घ्येतलेला असतो, अश्या वेळी तुमच्या भविष्याची टायटनीक होण्याची शक्यता जास्त… ! "मी अमुकला आज हे बोलून टाकले", "आज मी त्याला त्याची खरी जागा दाखून दिली" यासंबंधीची वाक्ये मी नेहमी ऐकतो. या वाक्यामध्ये प्रश्न सोडवण्या ऐवजी ते निर्माण करण्यावर जास्त भर असतो. Serco मध्ये असताना माझे सहकारी मला नेहमी, "सचिन तुझी चर्चा करण्याची आणि नातेसंबंध जपण्याची शैली म्हणजे Go with the flow ", तुला चुकीला चूक आहे असे स्पष्टपणे सांगता येत नाही का, मी म्हणायचो, मी चूक म्हणेलही, पण आज चूक म्हणालो आणि त्याने उद्या ते तसेच योग्य करून दाखवले म्हणजे… !

सांगायचा मुद्दा हाच कि आपल्या घरात टीवीच्या जागेपेक्षा पुस्तकाची जागा जास्त असू द्या… !

सचिन दाभाडे… !

Interview with Yahoo, Berkshire Hathaway chairman and CEO Warren Buffett said the best advice he ever received was from Berkshire Hathaway board-of-directors member Thomas Murphy. He told Buffett: "Never forget Warren, you can tell a guy to that you are fool and that is freedom of expression you can use anytime but you don't give up the right. So just keep your mouth shut today, and see if you feel the same way tomorrow."

Sometimes we comment on any person or even carry anger in expression just because it came in mind beause of Uncertain emotion and we carry feel as if relation will only be impacted with that particular guy and rest all thing will be as it is.The question is, how it take place in our personality development and relation building, whether it is positive or negative. We even can't imagine which type of problem will arise while managing team at work place and in businesses. Am i talking to a particular person due to certain approach is developed for the person? And; if is true then do we have idea, why did we accept such approach? Do we have any idea what would be the consequences? Often we don’t. We have various training and literature available in the market to understand all these complexities, moreover point is how we would reach there. So many such books had been read by us while completing graduation, and after reading it gave us sense that it could have been better to spend time on reading other book rather than completed one. But time already used to pass away. That’s the reason why it is always better to read after good observation and specific guidance rather than reading hastily for the heck of reading only, which will certainly help you build strong foundation. Some good website will help you along with books.

When we response people, do we take all other side in to our consideration? Is our responses based on understanding in totality of the thing? Otherwise keep in mind that we are developing weak relationship which will be ruined in very near future. Many of the time you tend to become titanic due to hit the iceberg by having only 20% of its above portion in mind. "today i scold somebody harshly", " I have shown him his right place today" such type of sentences i often hear. These sentences create a question rather solving it. When i was in Serco, my collogue use to say me "sachin your style of discussion and building relation is like Go with the Flow", can't you call incorrect for wronged one then and there. I use to say "I may say incorrect if things are wrong but, what if a person made it correct tomorrow".

The point is your size of library should be bigger than your TV.

Sachin Dabhade...
रविवारची सकाळ …. मस्त … फ्रेश अनुभव असतो ,काहीतरी झणझणित, तडका मारलेले लिहिण्यासाठी मला नेहमीच प्रेरणा मिळत राहते पण … मन मात्र पुन्हा पुन्हा काही तरी मुलभूत लिह्ण्याकडेच धाव घ्येते … तुम्हाला नेहमिसाठीच आराम मिळवा व् आयुष्यभरासाठी स्थिर व्ह्यवे हा विचार मनात येणे, ह्या किती मुलभूत मानवीय गरजा. पण पुन्हा पुन्हा प्रत्येक वळणावर आपण थांबत योग्य दिशेने चाललोय का? आपल्या क्षमता या मार्गाने वापरल्या जाणार आहेत का? हे प्रश्न तुमच्या स्थिर होण्याच्या मानसिक गरजेला व कृतीला पुन्हा पुन्हा आव्हान देत असतात. म्हणजे बघा ना एखाद्या इच्छित स्थळी जाण्यासाठी एखादा हाईवे तयार असने किंवा तयार करने हे निश्चितच आनंदाचे कारण; पण कित्येक आनंदाच्या आडवाटा आपल्या आयुष्यात कधीच येणार नाहीत याचीही तजवीज आपण करून ठेवतोच, नाही का? खरंच भारतीय लोकांसाठी सिनेमा हे नेहमीच विचार करायला लावणारे मध्यम, मलाही खूप धवळून निघाल्यासरख होत काही चांगले पाहिल्यावर, अर्थात: मी हे ठरवतो, काय पाहायचे आणि काय नाही, इम्प्तीयाझ अली हा असाच एक अवलिया जो मला नेहमी भावतो त्याच्या कलाकृतितुन. त्याच्या सिनेमानंतर बाहेर उठून आल्यावर तुम्हाला नेहमी काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत राहते. लातूरला असेच एकदा ट्रेनिंग साठी गेल्यावर त्याचा "तमाशा" पहिला, आणि अस्वस्थ करून गेला …

मला वाटते प्रत्येक वळणावर आपल्या क्षमतेला कुणी दुसर्याने प्रश्न केल्याऐवजी आपण स्वतःच का करू नये,म्हणजे कामातून पैसा आणि पैश्यातून पुन्हा काम, अशी योजनाच तुम्हाला तुम्ही आता करत असलेल्या कामाच्या भविष्यातील abjective पर्यंत घ्येउन जाईल. नाहीतर या उदाहरणातील व्यापार्यासारखे होईल. एक यशस्वी व्यापारी त्याचा उद्योग विकून टाकतो आणि आलेल्या पैशातून कित्येक पिढ्या आरामात बसून खातील म्हणून आलेला पैसा फार्म हाउस बांधने, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे आणि आयुष्यभर पैश्यातून व्याज मिळत राहील याची व्यवस्था करून स्वस्थ बसतो. पण अचानक एक दिवस तो त्याच्या संपत्तीचे नियोजन करणाऱ्या व्यवस्थापकाकडे जातो आणि पुन्हा एक व्यवसाय विकत घ्येण्याची गरज बोलून दाखवतो. व्यवस्थापक आश्चर्याने चकित होतो, कि इतक्या लवकर हे वळण का घ्येतले गेले, कारण एवढा भरमसाठ पैसा असताना एक नवीन व्यवसाय विकत घ्येण्याची गरज का भासली असावी ! व्यापाऱ्याने उत्तर दिले कि "मला माझ्या मुलाचे लग्न करायचे आहे आणि कुठलाही शहाणा व्यक्ती त्याची मुलगी काहीहि काम करत नसलेल्या व्यक्तीला पण घरात फ़क्त पैसाच असलेल्या मुलास देण्यास तयार नाही ".

सचिन दाभाडे
Sunday morning ….! Awesome.. Always a fresh experience.. I often have been motivated to write something spice & lucrative but mind flown away to write something which is foundational. Having a thought to be settle down at one place for permanently is apparently fundamental expectation. However, are we judging whether we are going in right direction at every turn ? whether my competencies are being used in greater extent? And these questions constantly challenging your psychological need and action which wants you to be stable. Now, let see, having a well prepared highway or to create it, to reach at desirable place always would be the reason of pleasure. But in the course we also ensure so many mid ways and hidden path will never come to our life, aren’t we?

Truly movies are medium of provoking the thought of Indian crowed, even I also get responsive after watching something good. Indeed, it is I who decides what to see and what not. Imtiyaz Ali is one of them, who astonish me always. After watching his movie you always feel incompleteness. When I was in Latur for a training once, saw his movie “Tamasha” and somewhere it took me to deep unsoundness of my heart!

I think, why shouldn’t you ask question to yourself at every turn of your life & career, rather, it is to be by asked by somebody else. Earning money from your work and again creating new work from the money earned, would be the only strategy will take you to your future objective for which you are working currently, otherwise your condition will not be much different from the businessman stated in given Example. A very successful businessman sold off his business and made a lot of money. After all the wealth was put into a well-planned trust in the most tax-efficient manner, the farm house rebuilt, the local charity supported, and after some days the man finally went to a wealth manager. He wanted to buy a business. The wealth manager was surprised that the turnaround was so quick. Wealth manager was surprised when the businessman told him the real reason. He was unable to get his son a bride because no sensible parent was willing to have their daughter wed into a family where no one did any work but there was a lot of money. That is why the man now wanted to buy a business.

Sachin Dabhade...
आक्सिडेंटमध्ये पाय फ्रैक्चर झाल्यावर आपण पायावर बैंडेज बाधून आराम करतो, त्याला बरे होऊ देतो. झालेली जखम तुम्ही नाकारत नाही,किंवा मला लागलच नाही असा आविर्भावही नसतो. हीच प्रतिक्रिया मानसिक धक्या (mental damage) बाबत होते का? याबाबत मात्र आपण काहीच घडले नाही असे ढोंग करताना नेहमीच दिसतो. बाहेरून स्वतःला स्टेबल प्रोजेक्ट करतांना आतल्या अस्वस्थतेला धूमारे फूटत असतात. मानसिक गोष्टिना याच पद्धतीने हाताळायची सवय तुम्हाला जडली असेल, तर एखाद्या दिवशी अचानक येणाऱ्या मोठ्या भावनिक भूकंपाची तयारीही करुण ठेवायला हरकत नाही.

शारीरक डॅमेज झालेले असताना तुटलेले हाड़ फरपटत घ्येउन फिरताना आपण विचारहि करू शकत नाही, इथे शारीरला मात्र वेळ दिला जातो. हेच मानसिक धक्का मिळालेला असताना घडले आणि स्वताला बर(heal) होण्यास वेळ दिला, तर तुमच्या रिटायरमेंट चा कालावधि वाढवता येऊ शकेल. एक उदाहरण देण्यासारखे आहे.

"माइंड ट्री" चे फॉर्मर सीईओ आपल्या ब्लॉग वर आमिर खानच्या वर्किंग स्टाइल आणि दूरदृष्टीचे उदा देऊन म्हणतात. एका सुपरस्टारला वर्षातून कमीत कमी 3 ते 4 सिनेमे बनवणे गरजेचे आहे. त्यात एखादा हिट होणेही तितकेच आवश्यक, असे असताना एक वर्षात, एक वेळी, एकच सिनेमा, ही स्ट्रेटजी स्पर्धेतून बाद झाल्याचा मेसेज देण्यासारखिच, तरीही हा पट्ठा पॅरेलल नसलेल्या भूमिका करून यशाचे नवे मानके स्थापित करतो आणि पुन्हा स्वतःला वेळ देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रमाणिकपणे जातो, वेळ घ्येतो, वेळ देतो...आणि परत जेव्हा येतो ते नवे आणि सक्षम काही तरी घ्येउनच.

सचिन दाभाडे...
मुन्नाभाई मूवी मध्ये बापू मुन्नाला सर्किट ची माफ़ी मागायला सांगतात, तेंव्हा त्याला कळते की एखाद्याला मारण्यापेक्षा त्याची माफ़ी मागने किती अवघड ..! अतिशय भावनिक प्रसंगात मुन्ना माफ़ी मागताना सगळ्याच्याच् डोळ्यातुंन पाणी आणतो... सीन आठवतो? काय आहे एवढं अवघड माफ़ी मागण्यात, फ़क्त दोन शब्द तर म्हणायचेय 'माफ़ कर' पण तरीही आयुष्य निघुन जाते, जवळचे हातातून दूर जातात, तडजोड करायला ही आपण तयार होतो पण आपल्याला कुणाची तरी गरज आहे हे मान्य करायला मन काही धजत नाही, मग ज्ञान आणि माहिती आभावी नष्ट झालो तरी चलते.
मानसशास्त्रीय दृष्टया माफ़ी मागने म्हणजे आपण फक्त स्वतः चूक आहोत एवढेच मान्य करत नाही तर समोरच्याची आपल्या आयुष्यातील गरजही अधिरेखित करत असतो (i need you). हे कमकुवत पनाचे लक्षण का मानले जाते हे समजने अवघड आहे ..!. आपल्याला समोरच्याची गरज आहे हे आपण किती वेळा स्पष्टपणे बोलतो ?, व्यवहारिक जगतात मी बऱ्याचदा असे अनुभवले, लीडरशिप आपल्या सोबत किंवा खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांकडून मदत मागने कमी प्रतिचे समाजते.

म्हणून आज हा प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय I know everything या अविर्भावात नेतृत्वाने किंवा ध्येयवादी व्यक्तिने वावरणे कितपत योग्य ?

सचिन दाभाडे
A newspaper boy daily gives newspaper, a milkman regular provides milk to your family. Have you ever gone to the electrician to solve your problem regarding your electronic gadgets or device? When he tells us to change any part of our asset, we say 'Yes' without any hesitation and allows them to do what they want to do it with the asset. We can give ample of example where we follow the direction or instructions without consideration of what would have been the truth behind. You follow him as it is, not because something must be right or wrong but, you know the parameters of his trustworthiness.
When your customer or stakeholder are able to get the meaning out of what you speak and act, is called as authenticity. You actually get raised as true professional, when authenticity becomes the part of your preffession, bit it can be any preffession you are involved in.

Remember, authenticity dosnt mean anything to be correct or incorrect, it is just bring yourself into daily practice, as you are.

Sachin dabhade

एखादा पेपरवाला रोज न चुकता पेपर टाकतो, दूधवाला न चुकता दूध आणतो, तुम्ही कधी आपल्या माहित असलेल्या व्यक्तिकडे आपले एखादे इलेक्ट्रॉनिक चे गॅझेट सुधारायला घ्येउन गेले आहात काय ? त्याने जेव्हा यात एखादी गोष्ट बदलावि लागेल असे म्हंटल्यावर आपण त्याला कुठलाही विचार न करता होकार कळवतो, अशी अनेक छोटी मोठी उदाहरणे देता येतील जिथे आपण खरे काय आहे, याची शाहानिशा न करताच समोरचा म्हणेल तसे फॉलो करतो, याचे कारण तुम्हाला मिळणारी सेवा ही चांगली किवा वाईट म्हणून नाही तर तीची विश्वासहार्तेचि मोजमापे तुम्हाला माहित असते.
तुम्ही सर्विस प्रोवाइडर म्हणून केव्हा काय बोलता याचा अर्थ तुमचा कस्टमर लावू शकने म्हणजे ऑथेंटिसिटी.
ही विश्वासहर्ता (authenticity) तुमच्या प्रोफेशन चा अविभाज्य भाग बनल्यावर तुमचा खरा प्रोफेशनल म्हणून उदय होतो.

लक्षात ठेवा, विश्वासहार्ता म्हणजे; काय चूक किंवा काय बरोबर याचे गणित नाही, तर तुम्ही जे आहात जसे आहात तेच तुमच्या रोजच्या प्राक्टिस मध्ये येणे होय .

सचिन दाभाडे..

Tuesday, May 17, 2016


One of the experience working with pharma MNC..!

Spectracare division deals with all communicative disease in Pharma sector, I was meeting doctors to take feedback on company’s product in slum area of Nasik. I had respective division manager with me. The place of hospital was so congested like small kitchen, however hospital was overflowing with patients. A manager who had come with me told doctor; that, our training manger has come down here to meet you and asked fever to meet directly, doctor told very clearly to wait outside, though. Manager got upset & settled down with helplessness. It seemed that, his impression was quite broken down, meanwhile due to rain, atmosphere became humid and we both became wet completely.
Now; he had to use all professional communication methodology and marketing strategies in such situation, in which he had been trained in my training session and I supposed to see how effectively he uses all learnings or to observe what difficulty he faces while using sales technique. He became quite relaxed when doctor allowed us to enter in doctor’s chember and explained the reason making us wait for long time. He was showing me, how he is applying all communication tactics while talking to the doctor. And also was indicating me that, how it is easy to tell in training, but difficult to apply on field in actual.
There was a man who was with his child, who dressed very colorfully and had style of cap of Anil Kapoor’s movie “A 1942 love story”. He was insisting doctor to prescribe medicine which costs below 50 Rs and even doctor was prescribing the same. One women was arguing that she requires only half of the bottle syrups to her child and that is the sufficient enough only and not to give full bottle, that is how she was trying to manage medicine cost in her budget. However doctor was handling all such talks patiently and moreover customizing his। approach as per Patients need. He gave 5 tablet free to one very old poor women, who had come alone to his hospital.
I wondered to see doctor was digesting how scarcity challenging medical knowledge and even I was trying to understand doctors business and his leadership which he is displaying in his area. I was completely wet till the time manger completes all scientific information of the product and finally I come out from the chember by having professional expression on my face as always.

Pharma MNC मध्ये काम करताना आलेल्या अनुभवपैकी एक !

स्पेक्ट्रॉकेअर डिवीज़न ही सर्व communicative डिसीज़ ला डील करते, नासिक च्या स्लम मध्ये काही डॉक्टर्स ना भेटून कंपनी च्या प्रोडक्ट चा फीडबॅक घ्येत होतो. सोबत रेस्पेक्टिव डिवीज़न मेनेजर ही होते, डॉक्टरच्या दवाखान्याची जागा एका छोटयाश्या किचन एवढी होती, पन दवाखाना खचाखच भरलेला, माझ्या सोबत असलेल्या मॅनेजर ने डॉक्टरांना सांगितले, की औरंगाबाद वरुन ट्रेनिंग मॅनेजर आलेत. डॉक्टर ने स्पष्ट शब्दात वाट पाहायला सांगितले. मॅनेजर थोडा नर्वस होऊंन बसला. थोड़ इम्प्रेशन डाउन झाल होत,त्यात पाऊस पडून गेल्यामुळे हवेत कमालीचा दमटपना असल्याने घामाने दोघीहि ओलेचीम्ब. मी ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या मेथड (method) आता अश्या कंडीशनमध्ये त्याला वापरायच्या होत्या आणि तो, त्या किती प्रभावीपने वापरतोय हे मला बघायचे होते किंवा त्यात काय अडचणी येऊ शकतात याचे निरिक्षण करायचे होते. आत मध्ये गेल्या गेल्या डॉक्टर ने लगेच वेटिंग मध्ये ठेवल्याचे एक्सप्लेनेशन दिल्याने तो थोडा हलका झाल्या सारखा वाटला. डॉक्टरशि बोलत असताना अधून मधून माझ्याकडे कटाक्ष टाकत, तो कसा सगळ्या कम्युनिकेशन प्रोसेस फॉलो करतोय हे दाखवत होता, आणि सोबतच, बघितलत किती सोप असते ट्रेनिंग मध्ये शिकवणे आणि अवघड असते प्रत्यक्षात अप्लाय करने, असा छुपा भाव.

दवाखान्यात एक रंगीबेरंगि शर्ट घालून आणि अनिल कपुरच्या 1942 लव स्टोरी सारखी स्टाइल असलेली टोपी घालून एक व्यक्ति आपल्या मुलाला घ्येउन आलेला. तो डॉक्टरकडून 50 रु च्या आत येणारी औषध लिहायला सांगत होता आणि डॉक्टर ते लिहतोहि, सोबत एक बाई आपल्या मुलासाठी फ़क्त आर्धि बाटली औषधच हवय पूर्ण गरज नाही असे म्हणून डॉक्टर सोबत डोक लावत होती आणि मेडिसिन तिच्या कॉस्ट प्लानिंग मध्ये बसउ पाहत होती. डॉक्टर अतिशय संयमाने सांगत शक्य तेव्हड़े कस्टमाइज करत होता. एका म्हाताऱ्या बाईला त्याने आपल्याकडे असलेल्या 5 गोळ्या फुकटच दिल्या, ती एकटीच् दवाखान्यात आलेली दिसत होती. आभावाने वैद्यकीय ज्ञानाला क्षणा क्षणाला दिलेले आव्हान डॉक्टर संयमाने पचवताना मी पाहत होतो. मी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो की डॉक्टरच्या या बिसिनेस आणि तो या क्षेत्रात करात असलेल्या नेतृत्वचा अर्थ कसा काढावा. मॅनेजर ने आमच्या प्रोडक्ट ची साइंटिफिक माहिती देऊन संपेपर्यंत मी पूर्ण ओला झालेलो, चेहऱ्यावर व्यवहारिक भाव कायम ठेवत मी नेहमी प्रमाणे बाहेर पडलो..!

सचिन दाभाडे

चित्र काढ़ताना ते केव्हा पूर्ण होणार आणि शेवटचा ब्रश कुठल्या रंगाचा असणार हे फ़क्त ते काढणाऱ्या चित्रकारलाच माहिती असत. इमारत बांधत असताना तिचा कॉन्ट्रेक्टरच सांगू शकतो की इमारत नेमकी कोणत्या क्षणाला परिपूर्ण होणार. एखादी बेस्ट डिश बनवत असताना शेफच सांगू शकतो की तिच्यात शेवटचे इंग्रेडिएंट काय व कसे पडणार. म्हणायचे एवढेच की गोष्टी सुरु करण्यासाठी झटताना तिचा शेवट आपल्या डोक्यात असतो का ?.

आपल्या आयुष्यच्या स्वप्नाचे मनोरे उभे करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या घटनामध्ये आणि त्याच्या प्लानिंग मध्ये काय येऊ शकते हे फ़क्त आणि फक्त स्वतलाच माहिती असते, तसे असेल तरच सुरु झालेली गोष्ट इछीत मुक्कामापर्यंत पोहचू शकते, अन्यथा हिल स्टेशन वर तर जायचे आहे पन, रस्ता आणि स्टेशनच माहित नसने याचा शेवट 0 ला मोठ्या संख्येने गुणल्यासारखेच.! (back to square) आणि त्यात पुन्हा चालकावर भरोसा ठेवणे म्हणजे एडमिन ला सीईओ बनवन्यासारखे.अशी सहल आनंद तर देते पन मर्यादित, बऱ्याच वेळेस हा आनंद जबरदस्तीने शोधून शोधून काढावा लागतो.

सचिन दाभाडे