Tuesday, December 12, 2017

आपल्याला एवढा राग का येतो.




आपल्या मानाच्या, अपमानाचा, अभिमानाच्या समजुती मोठया महत्प्रयासाने आपण जपत जपत मरेपर्यंत वाहून नेत असतो. या सर्व समजुती आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वपूर्ण भाग घडवत असतात. एवढेच नाही तर या समजुती (परसेप्शन) म्हणजे आपल्या भावविश्वचा आत्मा.

स्वतःबद्दलच्या बऱ्याच समजुती या वास्तवाच्या आधारावरच उभ्या असतील असे नव्हे, तर त्या स्वतःबद्दलच्या अभासातूनही आलेल्या असतात. पण हे सर्व आपल्या प्रत्येकासाठी वयक्तिक पातळीवर मात्र सत्यच असते आणि क्वचितच आपण त्याला आभास मानायला तयार असतो. अचानक एखादी छोटी घटना तुमच्या आभासी जगाला आव्हान देते आणि हा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो. या अभिमानाच्या पडझडीत उडालेली सर्व धूळ म्हणजे राग... जे तकलादू होते ते सर्व पडलेले असते, पण यामध्ये आपले काय नुकसान झालेय किंवा कुठे तडे गेलेय, हे उडालेली धूळ समजू देत नाही. तुमचे विचार ,तुम्ही बांधत आलेल्या स्वतःबद्दलच्या सामर्थ्याच्या कल्पना मातीत मिसळल्या गेल्या आहेत किंवा वास्तवाच्या कसोटीवर घासण्यासाठी येऊन ठेपल्या आहेत, हे तुम्हाला समजायला आणखी बराच वेळ लागणार असतो. कारण तुमच्या इमारतीच्या एकूण उंचीच्या अर्ध्या उंचीपर्यंत अजूनही धूळ आपले अस्तित्व टिकवून असते आणि ती जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत झालेली पडझड पाहणे केवळ अश्यक्य.

यासर्व गोंधळात झालेली पडझड शोधण्याचा प्रयत्न केला तर  नाकातोंडात धूळ जाऊन आपली सर्व यंत्रणाच कोलमडू शकते; म्हणून उडालेली धूळ जमिनीवर येऊ द्या, जमिनीवर पडलेल्या भग्नावशेषातून काय शिकता येईल ते शिका आणि पुन्हा नव्या दमाने वास्तवाच्या जमिनीवर आकांक्षेचे महल बांधने सुरू करा....!


सचिन दाभाडे.

Saturday, November 25, 2017

बघा, उठा, बांधा आणि विजयी व्हा..!



दोन गवंडी घर बांधत असतात. एकाला विचारले, तू काय करतोय. त्यांनी उत्तर दिले मी विटा रचतोय. दुसऱ्याला विचारले; तू काय करतोय, त्याने सांगितलं, मी एक मोठं आणि सुंदर असे घर बांधतोय. खरं बघितलं तर दोघांचेही काम सारखे आहे, दोघेही एकाच ध्येयासाठी काम करताय, परंतु जेव्हा दोघांनाही स्वतःचे काम व्यक्त करण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही वेगवेगळी उत्तर दिली. आता आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की कुठला व्यक्ती किंवा कुठला गवंडी त्याचे काम कम्प्लीट झाल्यावर अतिशय आनंदी असेल; पहिला की दुसरा ?
 ‎
पहिल्या गवंडीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने तो सध्या करत असलेल्या कामालाच त्याचे उद्दिष्ट म्हणून उत्तर दिले, तर दुसरा गवंडी हा त्या कामाचं शेवट किंवा आउटपुट डोळ्यासमोर ठेवून उत्तर देतोय. पहिल्याच्या कामातून त्यांचा उद्देश स्पष्ट होत नाही, तर दुसऱ्याच्या कामातून त्याचा उद्देश स्पष्ट होतो. त्यामुळे दुसरा गवंडी घर पूर्ण बांधून झाल्यावर त्याच्या पूर्णत्वाचा आनंद घेऊ शकेल, त्याच सेलिब्रेशन करेल, आणि पहिला मात्र यापासून वंचित असेल, याचे कारण जे त्याने पूर्ण केलेय ते त्याच्यासाठी रोजच्या कामासारखेच एक साधे काम असेल आणि त्यातून आनंद घ्यावा असे त्याला वाटावे हे दूर पर्यंत शक्य नाही. एखादे काम करत असताना ते कुठल्या उद्देशासाठी करतोय हे माहीत असेल तर ते काम पूर्ण झाल्यानंतर होणारा आनंदही मोठा असतो.

सध्या तुम्ही करत असलेल्या कुठल्याही कामाला भविष्याचा 'कनेक्ट' देता आला नाही तर त्या कामाचे मोठेपण आणि आनंद हा कमी किंवा नसल्यातच जमा असेल. हेच बघाना; जेंव्हा तुम्ही एखादा खड्डा खोदत असता तेंव्हा तुम्हाला दगड,माती यांचे विचार मनात येत नाही, तर तुम्हाला विहिरीतले पाणी दिसत असते. म्हणजेच तुम्हाला तुमची गरज सतत दिसत असते. समोरच्याला जेंव्हा तुम्ही फक्त खड्डा खोदताना दिसतात तेंव्हा तुम्हाला मात्र विहिरीचे पाणी आणि संपूर्ण विहीर दिसायला हवी. जेव्हा खड्डा खोदताना तुम्हाला विहीर दिसते, तेव्हा विहीर पूर्ण झाल्यानंतर तिचा पूर्ण होण्याचा आनंद तुम्हाला सगळ्यात जास्त असेल. म्हणून एखादं काम करतांना त्यामध्ये मनापासून आनंद घ्यायचा असेल, तर तिचा शेवट, रिझल्ट नजरेसमोर आना, त्याला व्हिज्युअलाइज करा. त्याला एक मोठ रूप द्या.
 ‎
प्रश्नपत्रिका काढणाऱ्या एखाद्या शिक्षकाला विचारा, तो काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका, जर तो म्हणाला की परीक्षेसाठी प्रश्न काढतोय, तर लक्षात ठेवा त्याला मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत फारसा आनंद असेलच याची खात्री देता येणार नाही, परंतु जर एखादा शिक्षक म्हणाला की विद्यार्थ्यांचं ज्ञान रिटेन होण्यासाठी किंवा त्यांना ज्ञानाची भूक वाढवण्याची नियोजन करतोय, तर मात्र आपण हा विश्वास ठेवू शकतो की नक्कीच विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं प्लॅनिंग हा शिक्षक करेल. एकूणच काय तर तुमचं आजचं काम हे फक्त आजच नाही तर ते तुमच्या उद्यावर, पुढच्या महिन्यांवर, पुढच्या वर्षावर आणि तुमच्या एकूण आयुष्यावर परिणाम टाकणारं आहे. तुमच्या भविष्याला विशाल व वेगळ वळण देणार आहे, असा भाव, अशी फिलिंग ज्या व्यक्तीमध्ये निर्माण होते, त्या व्यक्तीला काम पूर्ण झाल्यानंतरचा आनंद मोठा. म्हणून ज्या कामाचा शेवट डोक्यात आहे, ज्या कामाबद्दल पूर्ण चित्र डोक्यामध्ये आहे, त्याच कामाला हात घाला  तसे नसेल, तर तसे चित्र तयार करून मगच पुढचा प्रवास करा.

कामाच्या शेवटचं चित्र किंवा पूर्ण चित्र डोक्यात नसेल तर सुरू असलेल्या कामातून तुम्हाला प्रेरणा मिळेल की नाही याबद्दल निश्चिती देता येणार नाही, कारण हे सर्व आपण कशासाठी करतोय हेच माहीत नसेल, म्हणून सुरू केलेलं काम तुम्हाला अपेक्षित अशा ध्येयावर घेऊन जाण्यासाठी धेयनिश्चित करा, आणि बघा तुमच्या रोजच्या कामात कसे अविश्वसनीय बदल होतात. एक अनपेक्षित ऊर्जेने तुमचे कार्य भरून जाईल आणि अभुतपूर्व उत्साहाने तुमचे सर्व विचार कामाला लागतील.

............................
सचिन दाभाडे

Monday, November 20, 2017

Empty Pocket or Empty Mind..


What does make you fear, empty pocket or empty mind ? If your empty pocket fears you more than the empty mind , you will definitely have money full in your pocket by one fine day, but you will not have enough mind to use it mindfully. However, if your empty mind fears you more than the empty pocket , you will be controlled by your inner strength and never be affected by external forces. I believe it is very easy to full your pocket mindfully.

It does mean, not to know what you have to chase for, but to know, what are the things you are getting attracted towards. Knowing self is top most thing. We can workout on the direction, once we know it. Let's check out for some of the historical evidence to know, how it works. People who become billionaire or millenier got a birth with empty pockets and that was never a point for them to fear. They strived to bring new technology, new methods new knowledge, new skills through new businesses and new systems. They understood opportunity, need of the environment and invested complete energy to come up with complete platform to cater world and this made people with full of pocket.

Steve jobs started apple with empty pocket, Bill Get started Microsoft with empty pocket, Colonel Sanders started KFC with empty pocket, Sam Walton started WalMart with empty pocket, Mark Zuckerberg started Facebook with empty pocket, Dhirubhai Ambani started Reliance with empty pocket, Richard Branson started working with empty pocket who established the Virgin empire and so on, list will never end. We can give so many examples, where people hadn't anything in their hand, anything in their pocket, but they used their mind and become the leader of the century, however empty pockets never fear them. Now every one of them has a money, but still they are finding people with full of mind, They are searching best talent out of the world, new ideas out of the world, through which people can be served more potentially and intelligently. They are searching opportunities, understanding needs, because they know by only working on it would make them grow further.

People who seek money will get it for sure, but to expand it, thrust for mindfulness is the key. Remember you can't full your mind with money, but you can full your pocket by your full of mind.

................................
Sachin Dabhade
Management & Corporate Trainer

Thursday, November 16, 2017

भीती आणि आपण..!





भीती कशाने जाते हा प्रश्न किती जणांना पडतो ? सकाळी उठल्यावर पायाखाली काहीतरी थंड लागले तर काय विचार येईल, जर तुम्हाला लगेच आठवले की रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पाण्याची बॉटल ठेवली होती तर ठीक; अन्यथा, काहीतरी भयंकर पायाजवळ आहे असे समजून भंभेरी उडायला क्षणाचाही वेळ पुरेसा. म्हणजे भीतीमधून येणाऱ्या अनुभवापासून तुम्हाला वाचवले ते तुम्हाला कालच्या; मीच पायाजवळ पाण्याची बाटली ठेवली आहे, या झालेल्या ज्ञानाने. आणि समजा हे ज्ञान वेळेवर झाले नसते तर सुरवातीला 'शंका' आणि मग उत्तर नाही मिळाले तर 'भीती'.

आशा जेवढ्या प्रकारच्या भीती आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वाहून नेल्या जात असतात याचे एकमेव कारण म्हणजे अज्ञान. माझ्या भविष्याचे काय होईल?, माझ्या करिअर चे काय होईल? माझ्या कुटुंबचे काय होईल ? उद्या काय होईल ? या अन अश्या अनेक भीतींचे गारुड तुमच्या क्षमतेवर कायम प्रश्न चिन्ह उपस्थीत करत राहतात. या प्रश्नांची काहीच उत्तरे मुळातच नाहीयेत. याचे कारण, हे प्रश्नच मुळात प्रश्न नाहीये तर भीतीमुळे तयार झालेली वाळवंटातील ओयसिसे आहेत. ज्ञानाचा एक किरण याला भेदून जाऊ शकतो पण भीतीमुळे हे अदृश्य रूप जवळ जाऊन पाहण्याची मनाची तयारी नसते, अन्यथा ते नष्ट करण्यासाठी ज्ञानाची एक लकेर पुरेशी आहे. म्हणजे वास्तवाची जाणीव होणे हे भीती घालवण्याची प्रथम पायरी आणि ही जाणीव सतत प्रगल्भ  करत जाणे म्हणजे ज्ञानाच्या दिशेने केलेला प्रवास. गीते मध्ये सत्य (सत) आणि असत्य (असत) याची साधी व्याख्या आहे. जे वास्तवात आहे ते सत्य आणि जे वास्तवात नाही ते असत्य. म्हणून वास्तव आणि अवास्तव यात फरक करता यायला लागला की आपण भीती निर्माण करणाऱ्या यंत्राणेशी दोन हात करायला लायक झालो, असा त्याचा अर्थ आणि ज्ञान म्हणजे 'वास्तवाची स्पष्ट जाणीव'.

जेंव्हा आपण वास्तववादी व्हा असे म्हणत असतो तेंव्हा आपण ज्ञानी व्हा असेच एक अर्थाने म्हणत असतो. भीतीपासून दूर नेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या विषयात मिळवलेले ज्ञान. काही लोकांना स्टेजची भीती वाटते याच कारण ज्या  विषयावर बोलायचे आहे त्या विषयांमधे असलेले अज्ञान. जर तुम्हाला विषयाची पूर्ण माहिती असेल तर तुम्हाला कुठल्याही स्टेजवर कुणासमोरही जाऊन बोलायची कधीच भीती वाटणार नाही, मग भले ही तुमची भाषा चुकीची असेल, किंवा तुमचा टोन  चुकीचा असेल, किंवा फार इम्प्रेसिव तुमचा आवाजही नसेल.

वास्तववादी व्हा असे म्हणणे म्हणजे मुळात कुणाला चूक ठरवले असे नाही किंवा कुणाला बरोबर ठरवणे असेही नाही तर तुम्हाला जे वाटते ते वास्तवात आणने होय. नवीन शहरात गेल्यानंतर तिथल्या नियमांची, तिथल्या सिग्नल्सची आपल्याला माहिती नसते, म्हणून तिथे आयुष्य रूटीनवर येईपर्यंत सतत एक अस्वस्थता जाणवत असते. एकदा का आपण त्या शहरांसोबत मॅच झालो, म्हणजे आपण सहजासहजी कॉन्फिडंट होत जातो आणि हळूहळू भीती नाहीशी होत जाते. इथे नेमकं हेच होतं, जशी नवीन शहरातल्या वास्तवाची जाणीव झाली की, आपल्यातल्या असणाऱ्या अवास्तव भीतीची मुळं नाहीशी होतात. हेच नवीन मोबाइल घेतल्यावर, नवीन कॉम्प्युटर घेतल्यावर, किंवा मग नवीन कुठे तरी एखादा जॉब जॉईन केल्यावर सुरवातीच्या दिवसांत होते. पण जसं जसं आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींसोबत मॅच होत जातो आणि त्याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतीची जाणीव होत जाते तशी तशी भीतीही नाहीशी होत जाते. म्हणजे; भीती असेल तर एक लक्षात ठेवावं की त्या घटनेबद्दल किंवा गोष्टींबद्दल तुमच्या ज्ञानात वाढ करण्याची गरज आहे आणि ज्ञानी होण्यासाठी विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आता करत असलेल्या कुठल्याही कृतीमध्ये तुम्हाला भीती किंवा अस्वस्थता वाटत असेल तर थांबू नका , चालत रहा, कारण तुमची कृती आणि तिचे सातत्य हीच तुमच्यातल्या भीतीला सुरुंग लावेल व तुमच्यात आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तीचा उदय होईल..!

.....…...................

सचिन दाभाडे



Sunday, October 1, 2017

जितना बड़ा संघर्ष, उतनी बड़ी जित...!


जितना बड़ा संघर्ष, उतनी बड़ी जित...!


एखाद्या सीनेमामध्ये व्हिलन खुप सामान्य किंवा कमकुवत असेल तर हीरो हा खुप क्षमतेचा दखवण्याची गरजच नसते. पण, जर हिरोला खुप मोठ्या कॉनव्हास वर दाखवायचे असेल तर काय करावे लागेल? साहाजिक आहे, की व्हिलन खुप मोठा, शक्तिशाली, प्रचंड दाखवावा लागेल; म्हणजे त्या विरोधात लढणारा हीरो हा मोठा दखवता येईल. कल्पना करा बाहुबली मध्ये भल्लालदेव हा कमकुवत दाखवला गेला असता तर बाहुबली चा संघर्ष हा एवढा रोमहर्षक झाला असता का...? बाहुबली हा आपल्या नजरेत बलशाली आणि आदरास पात्र ठरतो याचे एकमेव कारण तो ज्या शत्रुशी लढतो त्याची क्षमता सुद्धा असामान्य आहे.

याच प्रमाणे आपले सर्व आइडॉल पुन्हा आठवून पहा एक गोष्ठी सारखी सापडेल प्रत्येकाचा निवडला गेलेला शत्रु तेवढाच ताकदीचा, मग ते चन्द्रगुप्त, अशोका, बुद्ध असोत की पृथ्वीराज, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, बाबासाहेब, अब्दुल कलाम असोत, किंवा स्टीवजॉब्स, बिलगेट्स, लारी पेज, सॅम वाल्टन, कोलोनियल सांडर्स, अगदी ओप्रा विनफ्रे, डेनियल ब्रैंसन ते ओबामा पर्यंत सगळयाचेच शत्रु मोठे...तुमच्यातील पाणी पाहणारे.

जगातील मोठ्या वेंचर उभे करणारे सीईओ आणि फाउंडर आपल्या मनात प्रचंड मोठी आणि अदराची जागा निर्माण करुन जातात, कारण झोपडीपासून किंवा एखाद्या गैरेजमधे आपल्या कंपनीची सुरवात करणाऱ्या दरिद्री माणसापासूनचा ते, आपल्या क्षेत्रातले जागतिक लीडर बनण्यापर्यंतच्या त्यांचा प्रवास मनावर भुरळ घालतो. गरीबी, दारिद्र्य, आभाव या सारखे प्रबळ आणि भल्याभल्यानां आपली प्रेरणा विसरायला लावून जागा दखावनारे शत्रु त्यांनी निवडलेले असतात, म्हणून त्यांचा संघर्ष मोठा होतो... नंतर तो महान होत जातो. आणि या शत्रुशि चाललेली त्याची झटापट आपल्या मनात त्यांना हीरो करुन जाते..

गांधीजी जगातल्या कुठेही सूर्य न मवाळनारयां सम्राज्यासोबत झगड़ले, सोबतच तो स्वतःमधील सर्वात हिंस्र असणाऱ्या भावनेशि झगडले. त्यांनी दोन्ही शत्रु मोठे निवाडले, वकील म्हणून विरोधी वकीलही शत्रु म्हणून निवडू शकले असते, राजकारणातहि बरेच शत्रु गाँधीजीना मिळाले असते पण त्यांनी दोन्हीही शत्रु; एक आतला आणि एक बाहेरचा, तोडीचे आणि दुर्दम्य असेच निवडले. म्हणून तर गांधी महात्मा झाले असे की आइंस्टाइनला ही म्हणावे लागले की येणाऱ्या पिढ्यांना विश्चास बसणार नाही, गांधी नावाचा हाडामासाचा मानुस पृथ्वीवर होऊंन गेलाय.

तुम्हाला भेडसावणारया समस्या या गल्ली बोळातील आहेत क़ी व्यापक, क्षणिक आहेत की दीर्घ, कमकुवत आहेत की दणकट, वैयक्तिक की वैश्विक, सामान्य की असामान्य. जर तुमच्या आयुष्याच्या सिनेमातील व्हिलन मोठा, तकदीचा, आणि क्रूर, तितका तुमच्या आयुष्याच्या सिनेमा हिट....सुपर हिट..!

शत्रु हो बड़ा जिसको, मुश्किल हो करना चित।
नायक वही बने, जो समझे संघर्ष की रीत।
जितना बड़ा संघर्ष, उतनी बड़ी जित।

.......................................

सचिन दाभाडे

Tuesday, August 29, 2017

पेराल ते उगवेल...!




असे म्हणतात या जगात कुठल्याही व्यक्तिचा सन्मान त्याने आयुष्यात काय मिळवले यावरून होत नाही तर त्याने आयुष्यात काय दिले यावरून होतो. लोकांच्या यशात ज्याला हातभार लावता आला तो स्वतः यशाची एक पायरी मुळातच चढून गेलेला असतो, म्हणजे जेंव्हा तुम्ही एखाद्याला डोंगरावर चढण्यास मदत करता, तेंव्हा तुम्ही स्वत:ला ही आकाशाच्या जवळच शोधाल. आपण इतरांबद्दल चांगले बोलायला लागलो की याची सुरवात होते. लोकांबद्दल फ़क्त चांगले बोलायची इच्छा असून भागत नाही, तर तुमचा त्यांच्याबद्दल असलेला चांगला विचार त्यांना ऐकायला ही गेला पाहिजे. जसा जसा तुमचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोण बनत जाईल तसा तसा तुम्हाला मिळणाऱ्या वागणुकीचा दर्जा वाढत जाईल. म्हणजे लोकांनी आपल्या सोबत खुप छान वागाव अस एखाद्याला अतिशय निकडीचे वाटायला लागले असेल तर त्याला करावी लगणारी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, तसेच वागणे त्याने दुसऱ्यासोबत सुरु करणे होय; म्हणूनच एखादा स्वार्थी व्यक्ति जेवढा स्वताःकडून फसवला जात असेल तेवढा कुणीही फसवला जात नसेल या जगात...!

मदर तेरेसा सारख्या परदेशातुन आलेल्या विदुषीला हे सत्य किती स्पष्टपणे अवगत होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे गरीब, अपंग, स्त्रीया, अनाथ मुले यांच्या जीवनामध्ये आनंदाचे छोटे छोटे कण पेरण्यात गेले. पण त्याबदल्यात त्यांना मिळालेला आदर ही आपण पाहतो, जो कुणालाही मिळणे सोपे नाही. याचे कारण त्या पहिल्यापासूनच खूप आदरणीय होत्या म्हणून त्यांनी ते कार्य केले नाही, तर त्यांनी ते कार्य केले म्हणून त्यांना आदर मिळाला. बाबा आमटे हे आनंदवनामध्ये कुष्ठरोग्यासाठी आयुष्यभर झटत होते आणि रोग्यांचा कुष्ठरोग बरा करताना एक दिवस त्यांना स्वतःलाच हा रोग झाला, अनेकांचे दुःख अंगावर घेऊन त्यांची मानोभावे सुश्रुषा करणारे बाबा आमटे आदरास पात्र झाले. ते काम त्यांनी स्वीकारले म्हणून ते आदरास पात्र झाले. म्हणून तुम्ही काय देता हे सगळ्या जास्त महत्वाचे.

अशा पद्धतीमधुन सर्जनशील नेतृत्व उभे करायचे असल्यास लोकानां तुम्ही त्यांच्या मागे आहात हा विश्वास देता आला पाहिजे आणि हा विश्वास देण्यासाठी प्रत्येकातील चांगले काय ते शोधता आल पाहिजे.चांगले ते शोधून वेळोवेळी प्रोत्साहन देता आले पाहिजे. चांगल्या प्रकारे आणि मनापासून केलेल्या प्रोत्साहानाला लोक आयुष्यभर सोडत नाही आणि दुसऱ्यामध्ये शोधलेली चूक आयुष्यभर तुम्हाला सोडत नाही. मनापासून केलेल्या कौतुकावर लोक वर्ष वर्ष काढतात हाच यातील सांगायचा मुद्दा. बर हे फ़क्त माणसांसाठीच नहीं तर यंत्रही बघा ना..वीज दिली की फ्रिज कूलिंग देतो, ट्यूब प्रकाश देतो.  गाड़ीला पेट्रोल दिले की ती आपल्याला प्रवास देते, निरिक्षण दिले की समज मिळते, कृती केली की अनुभव मिळतो. उगावणारया झाडाची प्रत ही, बी लावल्यापासून ते फळ हातात येईपर्यंत जी काळजी घेतली जाते त्यावर अवलंबून असते...

झाड़ लावले की फळ मिळते, पण मला झाड़ लावायचे नाही, मला फ़क्त फळ हवंय हे म्हणणे कसे वाटते...! हास्यास्पद वाटतेय ना ? वाटेलही, याचे कारण आपण त्याचे निरिक्षण करतो आणि मग तुलना करतो म्हणून हास्यास्पद वाटते. आता यासारखेच जर आपण आपल्या क्षमता आणि प्रयत्नांची तुलना आपल्या अपेक्षेशी केली, तर याहीपेक्षा खुप हास्यास्पद प्रकार हाताला लागण्याची शक्यता आहे. पण स्वताःवर हसणे जरा अवघड असल्याने आपण हा प्रयोग दुसऱ्यावर राबवण्यातच धन्यता मानतो.

एखाद्या झाडाला वाढवायचे असल्यास आपण त्याच्या आजूबाजूची जागा मोकळी करतो त्याला उंच वाढवायचे असल्यास बाजूच्या फांद्या कापून टाकतो म्हणजे पाणी आपोआप जे अस्तित्वात आहे त्याला जाते आणि झाड हव्या त्या आणि योग्य दिशेला वाढते. तुम्हाला समोरच्या च्या मनात काय वाढवायचं  आहे राग,प्रेम, आकस, विरोध, जे वाढवायचा आहे ते बोला, जे वाढवायचं नाही ते बोलण्यातून आणि वागण्यातून टाळा. आतून वाढ़ायचे असल्यास तुम्हाला जागा मोकळी करावी लागेल, आणि जे तुमच्याकडे आहे ते बाहेर द्यावे लागेल, दिले तर वाढ़ाल. स्वतःपाशी ठेवाल तर रद्दी होईल. म्हणुन वाढ़ायच की आयुष्यभर ओढायच हे तुम्हीच ठरवा..!


सचिन दाभाडे ... 

Friday, August 18, 2017

क्या समझे.... ?



आपली समज ही एकसंघ प्रक्रिया नाही ती वेगवेगळ्या लेवलमधे (स्तर) अस्तित्वात येते. माझी समज असलेल्या लेवल खाली देतोय त्या समजून घेऊ.

- आपल्याला सगळे समजते याची जाणीव होणे ही समजण्याची 'पहिली लेवल'.

- आपल्याला जे सगळे समजते तेवढेच दुसर्यालाही समजते हे समजण्याची 'दूसरी लेवल'

- जेवढे समजले तेवढे समजून घ्येउन समजदारीने वागायला सुरवात करणे ही समजण्याची 'तीसरी लेवल'.

- आपल्याला समजल्याप्रमाणे आपण पूर्णपणे वागतो आहोत असाच अट्टहास नसणे ही समजण्याची 'चौथी लेवल'.

- आपल्या वागण्याचा दूसरा चुकीचा अर्थ काढू शकतो हे समजून त्याच्याशी संवाद तुटू न देणे हे हे समजण्याची 'पाचवी लेवल'.

- आणि आपली एकूण समज ही जगाच्या एकूण समजेची छोटीशी समज आहे हे समजणे व् समजून घेण्याच्या प्रवासात प्रमाणिक पणे प्रयत्न करत राहणे ही 'शेवटची लेवल'.

या मी व्यक्त केलेल्या लेवल मधे कुणाला असे वाटले की; मला सर्वच समजते, त्याला आपण समजून घ्यावे...!

.................
सचिन दाभाडे